ADVERTISEMENT
home / बिग बॉस
दादूस झाले इलिमिनेट

Bigg Boss Marathi: दादूस झाले एलिमिनेट, आता होणार चुरशीची स्पर्धा

  बिग बॉसचा ग्रँड फिनाले जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतशी घरातील वेगवेगळी समीकरणं बदलू लागली आहेत. सध्या या रिॲलिटी शोचा 9 वा महिना सुरु आहे. 100 दिवसांचा हा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा आता अतितटीची झाली आहे. या आठवड्यात कोण जाईल? अशी चर्चा सुरु असताना आता दादूस या घरातून इलिमिनेट झाले आहेत. घरात दाखल झालेल्या सगळ्या सिनिअर सेलिब्रिटीपैकी दादूस हे  एक होते. ज्यांचा प्रवास हा इतके दिवस सुरु होता.या खेळात ते चांगलेच टिकून राहिले. पण नवव्या आठवड्यात त्यांच्या या प्रवासाला फुलस्टॉप लागला आहे. 

रात्रीस खेळ चालेमधून जुन्या शेवंताची एक्झिट

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघ झाली एलिमिनेट

दादूसचा प्रवास संपला

 दादूस म्हणजेच संतोष चौधरी हे या घरात आल्यापासूनच चर्चेत आले होते.त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून या खेळात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. घरातील पहिला टास्क हा त्यांनी जिंकला नाही पण लोकांची मनं जिंकली. घरात इतक्या काळासाठी ते टिकतील असे कोणालाही वाटले नव्हते. पण त्यांनी त्यांचा खेळ आणि घरातील नाती जपून आपले घरातील स्थान मिळवले होते. त्यामुळेच घरात एकदा कॅप्टन बनण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता.  पण असे असले तरी काही आठवड्यानंतर ते जय आणि उत्कर्षवर अवलंबून असलेले दिसून आले इतकेच नाही तर अनेक चुकीच्या निर्णयामध्येही त्यांचा सहभाग होता. याचा फटका त्यांना अनेकदा बसला. घरात काहींच्या जवळ असताना तीच लोकं त्यांना डेंजर झोनमध्ये टाकत होते हे दिसत असून देखील ते आपला स्टँड बदलू शकले नाही. त्यामुळे हल्ली त्यांचा खेळ चांगला सुरु असून ही त्यांना इलिमिनेट व्हावे लागले.

ADVERTISEMENT

 दादूसला कळला नाही खेळ

गेल्या दोन आठवड्यापासून घरात दादूस खेळताना दिसत होते. पण असे असले तरी त्यांच्या संगतीचा परिणाम हा त्यांच्या खेळावर होत होता हे अनेकदा महेश मांजरेकर त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण असे असूनही दादूस यांनी जय आणि उत्कर्ष यांची बाजू सोडली नाही. अनेकदा घरात मीरा, गायत्री आणि दादूस यांना बांडगुळाची उपमा देऊन सुद्धा देखील त्यांनी आपला स्वतंत्र खेळ दाखवला नाही. या नॉमिनेशच्या वेळी त्यांच्याच टीमधील काही जणांनी त्यांना नॉमिनेट केले होते. पण असे असले तर देखील त्यांनी खेळ हा अशाच प्रकारे सुरु ठेवला होता. त्यामुळे खूप जणांना त्यांना हा खेळ कळला नाहीच असे काही जणांना वाटते. खूप जणांना त्यांचा हा साधेपणाच खूप भावला होता. त्यामुळेच ते वाचत आले होते.पण आता सामना अतितटीचा होत चालला होता. साहजिकच आहे की, त्यांना याचा फटका बसणारच होता.

विकास-विशालमध्ये बदलली समीकरणं

जय आणि उत्कर्ष यांच्या गटातील आणखी एक खेळाडू आता बाद झाला आहे. त्यामुळे आता घरात जय, उत्कर्ष, गायत्री आणि मीरा असे खेळाडू राहिले आहेत. तर दुसरीकडे विकास, विशाल, सोनाली आणि मीनल  इतके खेळाडू राहिले आहेत. पण आता दुसऱ्या गटातील विशाल काही कारणास्तव जयकडे अधिक झुकताना दिसून आला आहे. सगळे निर्णय योग्य पद्धतीने घेणारा विशाल गेल्या दोन आठवड्यापासून घरात काहीतरी वेगळाच वागताना दिसत आहे. त्याचे हे वागणे खूप जणांना पटेनासे झाले आहे. 

आता या घरात कोणती समीकरणं बदलणार आहेत ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi: स्नेहा पाठोपाठ आता मीरानेही विकासवर केले आरोप

ADVERTISEMENT
28 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT