ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
लोकमान्य टिळक यांची माहिती

लोकमान्य टिळक यांची माहिती | Lokmanya Tilak Information In Marathi

भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक आणि जाज्वल्य देशभक्त असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव कोणाला माहीत नाही असं होणारच नाही. मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक. एक महान स्वातंत्र्यसेनानी, उत्कृष्ट वक्ते, उत्तम समाजसुधारक, आदर्शवादी असा राष्ट्रीय नेता, तसंच हिंदू धर्म, खगोलशास्त्र, संस्कृत आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची माहिती (Lokmanya Tilak Information In Marathi), लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य (Lokmanya Tilak Social Work In Marathi), लोकमान्य टिळक जयंती, लोकमान्य टिळक भाषण (Lokmanya Tilak Speech In Marathi) या सगळ्याबाबत माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. आधुनिक भारताचे शिल्पकार असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची माहिती खास तुमच्यासाठी. 

लोकमान्य टिळक माहिती – Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi
Lokmanya Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राम्हण कुटुंबात 23 जुलै, 1856 साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात त्यांचा जन्म झाला. टिळकांचे वडील त्यावेळी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तर संस्कृताचे अगाध ज्ञान त्यांना होते. केवळ 16 व्या वर्षी टिळक वडिलांच्या मायेला पोरके झाले. टिळकांच्या आईचे नावे पार्वतीबाई गंगाधर टिळक. तर वडिलांच्या बदलीनंतर टिळकांचे संपूर्ण कुटुंब हे पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे टिळकांनी तिथेच आपले शिक्षण पूर्ण केले. लोकमान्य टिळक यांची माहिती आपणा सर्वांना असलीच पाहिजे. लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने दरवर्षी खास कार्यक्रमही आपल्याकडे आयोजित केले जातात. लोकमान्य टिळक यांच्या शिक्षणाबाबतची माहिती घेऊया. 

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण (Education Of Lokmanya Tilak)

लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यामुळे त्यांचे शाळेतील किस्सेही प्रसिद्ध आहे. त्यांच्या बुद्धिचे आणि त्यांच्या धाडसाचे किस्से आजही लहान मुलांना ऐकविले जातात. गणित हा टिळकांचा अत्यंत आवडता विषय होता. आपल्या वडिलांकडूनच टिळकांनी धडे घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांचे शिक्षण पुण्यातील अँग्लो – वर्नाक्युलर स्कूलमध्ये झाले. शाळेतील ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, तर मी टरफले उचलणार नाही’ हा किस्सा खूपच गाजला आहे. त्यांनी फारच लहानपणी वडिलांचे छत्र गमावले. वडील गमावल्यानंतर 1877 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्या काळात पदवी मिळवणारी व्यक्ती म्हणजे अत्यंत नगण्य होती. अत्यंत हुशार असल्याने टिळकांनी त्याकाळी महाविद्यालयीन पदवी संपादन केली होती. पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून संस्कृत आणि गणितामध्ये बी. ए. ही पदवी लोकमान्य टिळकांनी मिळवली. त्यानंतर मुंबईतील सरकारी लॉ महाविद्यालयात त्यांनी एल. एल. बी. चा अभ्यास पूर्ण केला आणि 1878 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. दोन वेळा प्रयत्न करूनही एम. ए. मात्र त्यांना पूर्ण करता आले नाही. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Lokshahir Annabhau Sathe Information In Marathi)

ADVERTISEMENT
  • शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथील एका खासगी शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. मात्र त्यांचे विचार इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी न जुळल्याने आणि त्यांच्यातील मतभेदांमुळे 1880 मध्ये नोकरी सोडून दिली. 
  • यानंतर पत्रकार म्हणून कार्यरत अशताना अेक सामाजिक चळवळींमध्ये लोकमान्य टिळक सहभागी होऊ लागले. आपल्या भाषणातील ज्वलंत विचारांमुळे टिळक अधिक प्रसिद्ध होऊ लागले. 
  • आपले महाविद्यालयीन मित्र आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यासह भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाला प्रेरणा देण्यासाठी आणि देशातील तरूणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचा दर्जा आणण्यासाठी एकत्र येत ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली

महात्मा ज्योतिबा फुले विचार मराठीमध्ये

लोकमान्य टिळक राजकीय कारकीर्द – Political Career Of Lokmanya Tilak

Political Career of Lokmanya Tilak
Political Career of Lokmanya Tilak
  • 1890 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाविषयी पक्षाच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरूवात केली
  • स्वराज्य मिळविण्यासाठी आणि इंग्रजांना देशातून घालवून लावण्यासाठी लोकमान्य टिळकांना जोरदार बंड करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी स्वदेशी चळवळीला आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे समर्थन केले 
  • 1907 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामधअेय गटात वाद निर्माण झाला आणि दोन स्वतंत्र गटात विभागणी झाली. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध केला. ब्रिटिशांविरुद्ध चिथावणीखोर लेख टिळकांनी लिहीत चापेकर बंधूना प्रेरणा दिली
  • लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला. त्यांना 6 वर्षे हद्दपार करण्यात आले तसंच असंतोषाचे जनक अशीही पदवी त्यांना यावेळी देण्यात आली. बर्माच्या मांडले तुरूंगात सहा वर्ष त्यांना पाठविण्यात आले पण तिथेही त्यांनी ‘गीता रहस्य’ हे पुस्तक लिहिले
  • टिळकांची प्रसिद्धी खूपच वाढल्याने ब्रिटीश सरकारलाही त्यांच्यासमोर झुकावे लागले 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

लोकमान्य टिळक भाषण – Lokmanya Tilak Speech In Marathi

Lokmanya Tilak Speech In Marathi
Lokmanya Tilak Speech In Marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे अत्यंत उत्कृष्ट वक्ते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांची भाषणेही (Speech On Lokmanya Tilak In Marathi) खूपच प्रसिद्ध आहेत. लोकमान्य टिळकांची अनेक प्रेरणादायी भाषणे आहेत. इतकंच नाही तर लोकमान्य टिळकांचे कोट्स आजही आपल्याला प्रेरणा देतात. असेच लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण – 

मी स्वभावाने तरूण आहे. जरी माझे शरीर वृद्ध झाले असले तरी आत एक तरूण अजूनही जगतो आहे. जे काही मी आज बोलत आहे ते माझ्यातील तरूणास वाटत आले आहे. शरीर जरी क्षीण आणि कमजोर आणि नाशवंत असू शकते परंतु, शरीरात वास करणारा आत्मा नेहमी तरूण असतो याच प्रकारे आपले स्वराज्यामधील क्रियाकरणात नक्कीच गती मंद होईल तेव्हा आपल्या अंतरआत्म्याची स्वतंत्रता शाश्वत आणि अविनाशी न राहता तिचे दमन होईल आणि आपण स्वतःस गुलाम समजू.

ADVERTISEMENT

स्वतंत्रता आपला जन्मसिद्ध अधिकार आहे जेव्हापर्यंत हे माझ्यात जिवंत आहे मी म्हातारा होणार नाही. स्वतंत्रता या भावनेस कोणी हत्याराने कापू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही तर पाण्यात बूडवूही शकत नाही. कोणी हवेत उडवू शकत नाही. आपण आपले स्वराज्य मागतो आहे आणि आपण यास नक्कीच प्राप्त करू. राजकारणाचे विज्ञान हेच आहे की जे स्वराज्याने प्राप्त होते ते गुलामगिरीने प्राप्त होत नाही. राजकारणाचा उत्कर्ष हा देशाचा आधार आहे. मला तुमच्यातील आत्मा जागृत करायचा आहे. जो या देशाच्या राजकारणाच्या उत्कर्षातून निर्माण होईल.

मला या अंधविश्वासाला नष्ट करायचे आहे. जो गुलामगिरीमुळे तुमच्या आत्म्यावर बसला आहे हा अंधविश्वास तुम्हाला अज्ञानी धूर्त आणि स्वार्थी लोकांकडून पिडा आणि कष्ट देत आहे. राजकारणाच्या विज्ञानाचे दोन भाग आहेत एक ईश्वरीय आहे आणि दुसरा असुरीनिर्मित आहे. कोणत्याही राष्ट्राची गुलामगिरी असुरीनिर्मित असते. या दृष्ट भागाचा सद्कार्याशी कोणताच संबंध नसतो.

जे राष्ट्र यास योग्य ठरवतो तो ईश्वराच्या कोपाचा भाग ठरतो. जे असुरी निर्मीत राजकारणास साहसाने अमान्य करतात तर काही यासाठी साहसही करू शकत नाहीत त्यांना आपल्यासाठी हानिकारक गोष्टीची घोषणा ही करता येत नाही. राजनैतिक आणि धार्मिक शिक्षण याच सिद्धांताचे ज्ञान देण्यास सक्षम आहेत परंतु तरीही याबाबत योग्य शिक्षण सामान्यांना देत नाहीत.

स्वराज्याचा अर्थ कोण नाही जाणत कोणास ते हवे हवेसे वाटत नाही. जर मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून येऊ आणि तुमच्या घरी कायमचा राहण्यास अडून बसू आणि तुम्ही विरोध केल्यास त्यास न जुमानता मी ठाम राहिलो तर काय परिस्थिती होईल? काहींच्या मते आपणा सर्वांना स्वराज्याचा अधिकार नाही एका शतकाच्या कालावधी नंतर ही आपल्यावर राज काध्ससो इंग्रज म्हणतात आजही तुम्ही स्वराज्याच्या लायकीचे नाहीत.

ADVERTISEMENT

ठीक आहे, मग आपण त्याच लायकीसाठी स्वतःला प्रबळ बनवूया. आपल्या देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे त्यांना लाजिरवाणे वाटते. इंग्लंड सरकार भारतीय जवानांच्या मदतीने बेल्जियमसारख्या छोटया राज्यास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग हा काय लाजीरवाणा प्रकार नाही? जे लोक आपल्या मागण्यांमागे निरर्थक बोलतात त्यात त्यांचा कोणता तरी स्वार्थ असावा असे लोक ईश्वरातही दोष शोधतात.

आपण सर्वांनी देशाच्या आत्म्यास पारतंत्र्यापासून वाचवायला हवे, आपणा सर्वांना कठीण परिश्रम करावे लागतील आपल्या देशाची रक्षा करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे काॅंग्रेस पक्षाने स्वराज्य प्राप्तीचा प्रस्ताव पारित केला आहे.

व्यवहारिक राजकारणात स्वराज्याचा अधिकार मागण्याच्या ईच्छेचा प्रतिकार करणारे काही स्वार्थी भारताच्या काही समस्यांचा दाखला देणारे समस्यांना पुढे करून त्यांचा स्वार्थ साधत आहेत. निरक्षरता ही एक अशीच समस्या आहे परंतु आपण सर्वांनी मिळून ती दूर करता येते. ध्यानात ठेवा की या समस्या सर्वांना सोबत मिळूनच दूर करता येतात आपल्यासाठी याचे समाधान आहे की निरक्षरांच्या मनात ही स्वराज्यासाठी उत्कट इच्छा आहे जी आपण सर्वांची ताकद बनू दया. जे लोक आपले काम सहजतेने निपटून पूर्ण करतात ते निरक्षर असू शकतात परंतु मूर्ख नाही. ते तितकेच बुद्धीजिवी असू शकतात जितके शिक्षित लोक.

स्वराज्य मिळविणे हा इतका कठीण मामला नाही त्यामुळे स्वराज्यासाठी निरक्षरता कधीच समस्या बनू शकत नाही. अशिक्षित देशवासी या देशाच्या स्वराज्यासाठी नक्कीच हितकारी आहेच. त्यांना इतकाच अधिकार आहे जितका इतर जे स्वतःस सभ्य समजतात. परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही आज सर्वत्र एकच आवाज गुंजतो आहे. आता नाहि तर कधीच नाही. त्यामुळे या ईश्वराने दिलेल्या संधीचा आपण नक्कीच फायदा घेणार आहोत आपण आपले सर्व प्रयत्न त्याच्या उच्चांकास नेऊ. आत्मविश्वास हा आपल्या सर्वांचा एक महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे आपण सर्व प्रयत्न करूया.

ADVERTISEMENT

सावरकरांचे विचार सावरकरांच्या जयंतीनिमित्त

लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य – Lokmanya Tilak Social Work In Marathi

Lokmanya Tilak Social Work In Marathi
Lokmanya Tilak Social Work In Marathi
  • लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाला सुरूवात केली 
  • सुरत काँग्रेसनंतर लोकमान्य टिळकांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली होती. यासाठी टिळकांनी पैसा फंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला
  • तसंच लोकमान्य टिळकांनी लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी लढा देता यावा यासाठी 1881 मध्ये केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रांची सुरूवात केली आणि त्यातून अन्यायाविरूद्ध वाचा फोडली. ही दोन्ही वृत्तपत्र त्याकाळी तुफान प्रसिद्ध झाली
  • 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू केले 
  • 1916 मध्ये डॉ. अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने ‘होमरूल लीग’ या संघटनेची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली. आपल्या राज्याचे प्रशासन आपणच करावे अर्थात स्वशासन करावे यासाठी याची स्थापन करण्यात आली. 
  • हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळविण्यासाठी पुढाकारही लोकमान्य टिळकांनीच घेतला.

लोकमान्य टिळक यांची पुस्तके – Lokmanya Tilak Books In Marathi

Lokmanya Tilak Books In Marathi
Lokmanya Tilak Books In Marathi

भारतीय इतिहास, संस्कृती आणि हिंदू धर्म यावर अनेक पुस्तके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिली. टिळकांचा संस्कृत आणि इंग्रजी वाङ्‌मयाचा सखोल अभ्यास होता. भारतीय तत्त्वज्ञान हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता. त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली, त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली असल्याचे दिसून येते. त्यांची प्रमुख पुस्तके म्हणजे 

ग्रंथ गीतारहस्य – आपल्या गीतारहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला, तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात त्यांनी आचरणात आणून दाखविला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरांतील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीतारहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान ठरले आहे. 

ओरायन – ओरायन हा एक लोकमान्य टिळकांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. 1892 च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी तो तयार करण्यात आला होता. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला. माक्स म्युलरने जो वेदांचा काळ ठरविला तो भाषिक संशोधनावर ठरविला असल्याने तो बरोबर नाही; संशोधनाची ही पद्धत एकांगी होय, असे टिळकांचे मत होते. म्हणून त्यांनी भाषाशास्त्र, दैवतशास्त्र, संहिता आणि ब्राह्मणे यामधील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित केले आणि  ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ सु. इ. स. पू. 4500 वर्षे हा ठरविला. 

ADVERTISEMENT

दी आर्क्टिक होम इन दी वेदाज – लोकमान्य टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून 1898 मध्ये टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना याची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे, हे अनुमान वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकमान्य टिळक जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही लोकमान्य टिळक माहिती (Lokmanya Tilak Information In Marathi), लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य, लोकमान्य टिळक यांचे भाषण ((Lokmanya Tilak Speech In Marathi) नक्की वाचा.

23 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT