पूर्वीच्या काळी मोबाईल फोन नसूनसुद्धा लोकांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांना कितीतरी गोष्टी लक्षात राहायच्या. अगदी कितीही जुने दाखले, हिशोब, गणितं त्यांना अगदी तोंडपाठ असायची. पण आता मात्र लोकांना मोबाईल फोन घेतल्याशिवाय काही आठवणार नाही. सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करायची सवय लागली आहे. पण समजा काही कारणास्तव तुमच्याकडे मोबाईल फोन नसेल. अशावेळी मात्र तुम्हाला तुमच्या बुद्धीवर जोर द्यावा लागेल की नाही. म्हणूच आज आपण स्मरणशक्ती वाढवण्यावर थोडी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये आपण स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार, स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासने, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीक उपचार, लक्षात ठेवण्याचे उपाय.. शिवाय केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशांसाठी काही सोप्या गोष्टी आणि बुद्धी कशी वाढवावी या विषयी अधिक माहिती घेणार आहोत मग करुया सुरुवात.
सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत स्मरणशक्ती वाढवण्यासाठीच्या योगासनांनी. योगाचे शारिरीक फायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण योगा तुमच्या स्मरणशक्ती आणि बुद्धीसाठीही चांगला आहे. जाणून घेऊया नेमका कोणता योगा प्रकार तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायद्याचा आहे.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सगळ्यात पहिलं आसन आपण पाहणार आहोत ते सर्वांगासन. सर्वांगासनामध्ये तुमचे दोन्ही पाय हवेत वर करायचे असतात. असे करताना तुम्हाला कमरेकडून आधार द्यायचा असतो. या आसनामुळे तुमच्या मेंदूला योग्य तो रक्तपुरवठा होतो. मेंदूला झालेल्या योग्य रक्तपुरवठ्यामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहतो. त्यामुळे याचा फायदा तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी होतो.
भुजंगासनामध्ये तुम्हाला सापाप्रमाणे मान मागे करायची असते म्हणूनच याला cobra pose असे सुद्धा म्हणतात. तुम्हाला पोटावर झोपून हाताच्या मदतीने अंग उचलायचे आहे. असे करताना तुम्हाला तुमचे डोके पाठीच्या दिशेने झुकवायचे आहे असे करताना तुम्हाला या आसनामध्ये काही किमान 1 मिनिटं तरी तसेच राहायचे आहे. यामुळे तुमच्या मज्जासंस्थेला चालना मिळते आणि त्याचा परीणाम तुमच्या मेंदूवर होतो. योग्य प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते.
पद्महस्तासन हा व्यायामप्रकारसुद्धा तुमच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगला आहे. तुम्हाला सरळ उभं राहून हात वर करुन तसेच कंबरेतून वाकत खाली यायचे आहे. असे करताना तुम्हाला जमिनीला हात टेकवता यायला हवा. शिवाय गुडघ्यात न वाकता तुम्हाला तुमचे डोकं तुम्हाला गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामुळे तुमच्या मज्जासंस्थेवर ताण पडतो. शिवाय तुमच्या मेंदूला योग्य असा रक्तपुरवठा होतो. स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय करत असताना तुम्ही हे आसन करू शकता.
हलासनामध्ये तुम्हाला पाठीवर झोपायचे असते. पाय हवेत उचलून तुम्हाला ते तुमच्या डोक्यापर्यंत आणायचे असतात असे करत असताना तुमच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा होतो. तुमच्या पाठीच्या कण्यासोबतच तुम्हाला मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्ही हलासन करु शकता.
स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी आणखी एक सोपं आसन तुम्ही करु शकता ते म्हणजे पद्मासन . पद्मासनामुळे तुमचे मन शांत होते. मन शांत झाल्यामुळे तुमच्या मेंदूवरील ताण कमी होतो. ताण कमी झाल्यामुळे तुमचं डोकं शांत राहतं. त्यामुळे तुम्ही पद्मासन अगदी घरच्या घरी आणि कधीही करु शकता. पद्मासन करत असताना तुम्ही ओमकार म्हटला तरी चालू शकेल.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगासनं पाहिल्यानंतर आता आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहार पाहणार आहोत. हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे खानपानात झालेले बदल तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम करत असतात. त्यामुळे तुम्ही नेमका काय आहार घ्यायला हवा ते पाहुया.
चॉकलेट हे नेहमीच शरीरासाठी चांगले असते. तुम्ही जर डार्क चॉकलेट खाल तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच जाणवतील. डार्क चॉकलेटच्या सेवनामुळे तुमच्यावरील अतिरिक्त ताण कमी होतो आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते.
जर तुम्ही आहारात मासे खाऊ शकत नसाल तर तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेऊ शकता. याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या बुद्धीला चालना देण्याचे काम फिश सप्लिमेंट करु शकतात. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घेऊन फिश सप्लिमेंट घेतात.
चॉकलेटमध्ये असलेले कोकोआदेखील तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले असते.मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्यासाठी कोकोआ चांगले आहे. त्यामुळे तुम्ही अगदी हमखास कोकोआ खा. कारण त्याचा तुम्हाला योग्य तो फायदा होऊ शकेल. हल्ली बाजारात कोकोरआची पावडर मिळते. ज्याचा उपयोग तुम्ही करु शकता.
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अनेक चांगले आयुर्वेदिक उपचार आहेत. जर तुम्हाला आर्युवेदिक उपचारपद्धती हव्या असतील तर तुम्ही हे आर्युवेदिक उपचारही करु शकता. जाणून घेऊया याच आर्युवेदिक उपचार पद्धती.
अश्वगंधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यापैकीच स्मरणशक्तीवर होणारा अश्वगंधाचा परिणाम हा वाखाणण्यासारखा आहे. अश्वगंधाची मुळे औषधांप्रमाणे घेतल्याने तुम्हाला फायदे होतात. अभ्यासातूनही हे समोर आले आहे. तुमच्या मेंदूला योग्य रक्तपुरवठा करण्याचे काम अश्वगंधा करते.
अश्वगंधाप्रमाणे ब्राम्हीही तुमच्या मेंदूला अॅक्टीव्ह ठेवण्याचे काम करते. अनेकदा मन शांत होण्यासाठी ब्राम्ही घेण्याचा सल्ला दिला जातो. अल्झायमर सारख्या आजारांपासून ब्राम्ही तुम्हाला दूर ठेवते. मेंदूला चालना देण्याचे काम ब्राम्ही करते. त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात ब्राम्हीचे सेवन करु शकता.
आयुर्वेदात शंखपुष्पीचे अनेक फायदे सांगितले आहेत. बुद्धीसाठी शंखपुष्पी चांगले असल्याचे पुराणात सुद्धा म्हटले आहे. शंखपुष्पीच्या सेवनामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही शंखपुष्पीचे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे.
गोटू कोला अनेक बाबतीत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. अगदी त्वचेच्या समस्येपासून ते सेक्सपर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. पण तुमच्या मेंदुला चालना देण्यासाठीही गोटू कोला चांगले आहे. गोटू कोला नावाची वनस्पती तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगली असून तुम्ही त्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. एका प्रयोगादरम्यान गोटू कोलाच्या वापरामुळे चांगले बदल झाल्याचे दिसून आले आहेत.
स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आहारात असणे गरजेचे असते. अगदी तशाच काही गोष्टी तुम्ही आहारातून वगळणे गरजेचे असते. आहारात जर या गोष्टी असतील तर त्या तुमच्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम करतात. आता अशा काही सवयी किंवा खाद्यपदार्थ पाहुया जे तुम्ही तुमच्या सवयींच्या यादीतून काढून टाकायला हवे.
1. मद्य सेवन
आरोग्यासाठी मद्य सेवन अजिबात चांगले नाही. मद्य सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत असतीलच. पण तुमच्या मेंदूवरही मद्य सेवन विपरीत परिणाम करतात. त्यामुले त्याचे सेवन तुम्ही टाळले पाहिजे.
2. जंक फूडची सवय
सध्या सगळ्यांना जंक फूडची सवय लागली आहे. जंक फूडमुळे तुमचे आरोग्य खराब होते. यामध्ये वापरलेले तेल,मसाले हे तुम्हाला सुस्त करुन टाकतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला असलेली जंक फूडची सवय सोडा. कारण ती तुमच्यासाठी घातक ठरु शकते. जर तुमच्या लहान मुलांना अशी सवय लागली असेल तर त्यांची ही सवय तुम्ही लवकरात लवकर सोडा कारण लहान मुलांवर त्याचा त्रास लवकर दिसून येतो.
3. जास्त विचार करणे
काही जणांना खूप विचार करायची सवय असते. ही सवय तुम्हालाही असेल तर आताच खूप विचार करणे बंद करा. कारण सतत विचार करण्यामुळेही तुमच्या मेंदुवर ताण पडू शकतो. अति विचार केल्यामुळे तुमचे लक्ष कशातही लागत नाही. त्यामुळे शक्य असेल तर विचार करणे थांबवा.
4. गोळ्यांचे अतिरिक्त सेवन नको
काहींना अगदी क्षुल्लक कारणासाठी औषधांच्या गोळ्या घ्यायची सवय असते.गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनाचा परिणामही तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. तुमच्या तब्येतीवर त्याचे विपरीत परिणाम होऊ लागल्यावर तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. त्याचा परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होऊ शकतो.
5. आरोग्याच्या तक्रारीकडे करु नका दुर्लक्ष
तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही तुमच्या स्मरणशक्तीसाठी चांगले आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा त्रास हमखास होऊ शकतो. म्हणून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
केळ्यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. त्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्तीसाठी तुम्ही केळ्यांचे सेवन केल्यास फारच उत्तम.
मुलांच्या अभ्यासासंदर्भात पालकांच्या अनेकदा तक्रारी असतात की ते अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नाही. अशावेळी तुम्ही मुलांना अधिकाधिक चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवा. फोनपासून दूर ठेवत त्यांना मैदानी खेळ खेळांंमध्ये अधिक गुंतवून ठेवा. त्यांना वाचनाची आवड लावा. त्यांच्यासोबत असे खेळ खेळा जे त्यांना सतत प्रश्न निर्माण करण्यास उद्युत करतील.
तुमच्या आहारातील खाद्यपदार्थांचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमच्या जंक फूड किंवा असे काही पदार्थ असतील तर ते तुमच्या शारिरीक क्रिया मंदावू शकतात. त्यामुळे तुम्हाला आहारात योग्य पदार्थ घेता आले तर फारच उत्तम
आता तुम्हाला जर तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच विचारात घ्या.
पुढे वाचा -
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.