भोवताली माणसांचा कितीही गराडा असला तरी तुम्हाला एकटेपणा जाणवतो का? हा एकटेपणा अनेकांच्या आयुष्यात नकारात्मकता आणतो. एकटेपणाने तुम्हालाही ग्रासले असेल तर आपल्या आयुष्याचे आपणच शिल्पकार म्हणत यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपणच शोधायला हवा. एकटेपणातून बाहेर पडताना त्यात काय शिकलो? आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यात नेमका कोणता बदल करु याचा अंदाज आपल्याला नक्की येईल. अशा या एकटेपणात तुमचे सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही काही कोट्स, स्टेट्स शोधून काढले आहे. जे तुमच्या एकाकी झालेल्या भकास आयुष्याला नवी दिशा आणि नवी प्रेरणा देतील. जाणून घेऊया मराठी एकटा स्टेट्स.
सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या कारण जी लोकं बाहेरुन चांगली दिसतात ती आतून मुळीच चांगली नसतात
एकटेपणा… असतो तेव्हा डोळे कमी… आणि मन जास्त रडतं
माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत नशीबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस
कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:चे निर्णय स्वत: घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्याचा आनंद मिळतो चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो
खूप काही मिळवताना थोडं काही निसटतं थोडं काही निसटतं त्यामुळेच सगळं बिनसतं
शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो
काही दु:ख अशी असतात ज्यांना आपण सहन करु शकतो पण कधीही कोणाला सांगू शकत नाही
एकटेपणा चारोळ्या (Alone Charolya)
एकटेपणा कधीच कोणाच्या आयुष्यात येऊ नये आणि जर तो आला तरी तुमचे आत्ममनोबल तोडू नये. म्हणूनच तुम्ही एकटेपणा चारोळ्या वाचून मन रिझवा आणि आयुष्यात पुढे चला
तुम्ही एकटा आहात, असा समज अजिबात करु नका कोणीतरी असं असतंच, जे तुम्हाला कळू न देता जे तुमची काळजी करतं असतं
मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत पण जेव्हा मन उदास असतं ना तेव्हा विचारणार कुणी नसतं
आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा आपलाच आपल्यावर विश्वास असेल
जिथे एकटेपणा वाटतो आजकाल तिथेच वेळ घालवतो मी कारण… माणसांच्या गर्दीने भरलेल्या कलियुगात हसत हसत लोकं विश्वासघात करतात हे कधी कळत नाही सुन्या सुन्या झाल्या- चंदेरी वाटा
नभी मधू चंद्रही एकटा होता अशा चांदराती तुझ्यासोबत गुफंलेला माझा हात हवा होता
निसर्गाला रंग हवा असतो फुलाला गंध हवा असतो माणूस एकटा कसा राहणार कारण, त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो
कोणी दखल घेत नाही… खूपच एकाकी वाटतं ध्येय खचतं, सगळं संपल असं वाटतं. जेव्हा आपलं कोणी असं नसतं पण संपतं तिथेच तर तांबड फुटतं -रेणुका खटावकर
सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही आणि आपलं असं कोणी सोबतं असलं म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही
लाखो तारे सामावूनही स्वत:मध्ये असेल ती मजपासून दूर वैरीण रात्र माझी एकटी, अरे कोम म्हणतो आहे मी एकटा, तो अर्धा चंद्र, गार वारा,अन् आठवणी आहेत सोबती
वाट पाहुनी सकाळी गेली कोडे घालूनी दुपार सरली सायंकाळी वाटचं थकली एकटी रात्र सोबत उरली
मी एकटा असतो तेव्हा अन् संपतो गाजावाजा जेव्हा प्रश्न माझा माझ्यासाठी मी माझा असतो केव्हा?
मनातील एकटेपणाची भीती तेव्हाच गायब होते जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते
असं ऐकलंय की, श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले ही पुन्हा भेटायला येतात.
कोणी कितीही आनंदी असू द्या पण ती व्यक्ती ज्यावेळी एकटी असते त्यावेळी तिला जिची सगळ्यात जास्त आठवण येते त्यावरच तिचे खरे प्रेम असते
काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात इच्छा असते सोबतीची… कोणी असेलही सोबतीला तयार पण असं काही जुळून येतं की, मी आणि माझा न संपणारा तो प्रवास!- दत्तात्रय पाटील
खूप एकटेपणा जाणवणाऱ्यांसाठी स्टेटस (Feeling Alone Status In Marathi)
आयुष्याच्या एका वळणावर जर खूप एकटेपणा जाणवू लागला तर त्यातून बाहेर पडणे फारच गरजेचे असते. नाहीतर मनात विचित्र प्रश्नांचे काहूर माजते. मनातील वाईट विचारांना काढून टाकले की, त्यातून नव्या आणि चांगल्या गोष्टी करण्याचा एक उत्तम मार्ग सापडतो. त्यामुळे हा एकटेपणा मनातून काढून टाकण्यासाठी भावनांना या स्टेटसमधून मार्ग मोकळा करुन द्या.
कधी कधी मनात नसतानासुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटं राहावं लागतं
रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवसं बोलली नाही तर अर्ध आयुष्य संपल्यासारखे वाटते
प्रत्येकाला आपले दु:ख सांगत बसू नका. कारण प्रत्येकाकडे त्याचे औषधं असतेच नाही
आभाळासारखे प्रेम केले तर पावसाप्रमाणे रडूच येईल ना!
जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत जा कदाचित उद्या ‘वेळ’ असेल पण ज्याच्यासाठी वेळ काढला आहे ती व्यक्ती नसेल
एकटेपणा खूप चांगला असतो कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज नसते
ती जखम कधीच भरत नाही जी आपल्याकडून मिळालेली नसते
आठवणी.. ज्या कधी अनमोल होत्या माझ्यासाठी त्या आता भूतकाळात जमा होत्या
तुला काहीच बोलायचं नाही मला चुक तर माझीच आहे कारण मी तुझ्यावर स्वत:हून जास्त विश्वास ठेवला
सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो? जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय? हे विचारणारेसुद्धा कोणी नसते
वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी ‘अनुभव’ म्हणजे काय? तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते
जेव्हा कोणाच्या आयुष्यात आपले महत्व कमी होऊ लागते तेव्हा आपोआपच रिप्लाय Slow होऊ लागतात बोलणं कमी होऊ लागतं आणि Busy होण्याची कारणं दिली जातात.
जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचंय
जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो मात्र कधीच काही विसरत नाही
आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की, एकटेपणा नक्की काय असतो!
आयुष्यात आलेल्या एकटेपणाला खचून न जाता त्याला सामोरे जा. मनातून सगळ्या किलमिषांना बाहेर जाऊ द्या आणि नव्या चांगल्या नात्याची सुरुवात करत भूतकाळ विसरुन जा.