ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती | Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार होतेच शिवाय ते महान समाजसुधारक, न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ आणि तत्त्वज्ञ देखील होते. स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री असलेल्या बाबासाहेबांनी आयुष्यभर मागासलेल्या आणि दलितांच्या अन्यायाविरूद्ध आपले आयुष्य वेचले. दलितांचा उध्दारकर्ता असंच त्यांना आजही ओळखलं जातं. महिला आणि कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अर्थशास्त्रात उच्चविद्याविभूषित असलेल्या आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक विषयांवर संशोधने केली होती. त्यांचे भारताच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891 रोजी असल्यामुळे हा दिवस बाबासाहेबांची जयंती या नावाने ओळखला जातो. या तारखेला भीमजयंती या नावानेही ओळखले जाते. भारत आणि भारताबाहेर हा दिवस समता दिन म्हणूनही साजरा केला जातो. यासाठीच या खास दिनानिमित्त जाणून घेऊ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती (Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi).

Table of Contents

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती थोडक्यात – Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi In Short
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण – Dr. Babasaheb Ambedkar Early Life In Marathi
  3. डॉ. भिमराव आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास (Dr. Babasaheb Ambedkar Education )
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैयक्तिक जीवन – Dr. Babasaheb Ambdkar Personal Life In Marathi
  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
  6. अस्पृश्यता आणि जातीभेद विरोधी चळवळ (Dalit MoveMent)
  7. डॉ. आंबेडकरांचा राजकीय प्रवास (Political Journey Of Dr. Babasaheb)
  8. भारतीय संविधान (Constitution Of India)
  9. डॉ. आंबेडकरांनी का स्वीकारला बौद्ध धर्म – Dr. Babasaheb Ambedkar Accepted Buddhism Marathi
  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि धार्मिक योगदान:
  11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक, आर्थिक आणि प्रशासकीय योगदान
  12. संविधान आणि राष्ट्र उभारणी
  13. बाबासाहेबांनी केले शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याण
  14. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके – Dr Ambedkar Books In Marathi
  15. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनोरंजक माहिती – Doctor Babasaheb Ambedkar Information In Marathi
  16. डॉ. आंबेडकरांचा मृत्यू (Dr. Ambedkar Death)
  17. FAQ’s – डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती थोडक्यात – Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi In Short

बाबासाहेबांचे नावडॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म१४ एप्रिल १८९१ (डॉ. आंबेडकर जयंती)
जन्मस्थळइंदौर, मध्यप्रदेश
वडीलांचे नावरामजी मालोजी सकपाळ
आईचे नावभिमाबाई मुबारदकर
बाबासाहेबांच्या पत्नीचे नावरमाबाई आंबेडकर आणि सविता आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणएम ए. ( अर्थशास्त्र) एलफिस्टन हायस्कूल, मुंबई विद्यापीठ
पीएचडी ( कोलंबिया विद्यापीठ)
मास्टर ऑफ सायन्स  (लंडन विद्यापीठ)
डॉक्टर ऑफ सायन्स (लंडन विद्यापीठ)
पुरस्कार• बोधिसत्व (1956)
• भारतरत्न रिबन भारतरत्न (1990)
• फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम (2004)
• द ग्रेटेस्ट इंडियन (2012)
व्यवसायन्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी,
शिक्षणतज्ञ, लेखक, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ,
धर्मशास्त्रज्ञ, इतिहासकार प्राध्यापक, संपादक
मूल बाळयशवंत आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय पक्षअनुसूचित जाती महासंघ
स्वतंत्र कामगार पक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
इतर राजकीय संलग्नतासामाजिक संस्था :
• बहिष्कृत हितकारिणी सभा
• समता सैनिक दल
शैक्षिक संस्था :
• डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
• द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
• पिपल्स एज्युकेशन सोसायटी
धार्मिक संस्था :
भारतीय बौद्ध महासभा
बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू६ डिसेंबर १९५६
बाबासाहेब आंबेडकरांची समाधी स्थळचैत्यभूमी, मुंबई, महाराष्ट्र
Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi In Short
Information Of Dr Babasaheb Ambedkar In Marathi
Dr Babasaheb Ambedkar

instagram

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालपण – Dr. Babasaheb Ambedkar Early Life In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14 वे अपत्य होते. त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि त्यांची पोस्टिंग इंदूरजवळील महू येथे होती, जिथे आंबेडकरांचा जन्म झाला. 1894 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाले. काही दिवसांनंतर त्यांच्या आईचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले, 1906 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचा विवाह 9 वर्षांच्या रमाबाईशी झाला. त्यानंतर 1908 मध्ये त्यांनी 12वीची परीक्षा दिली. आंबेडकरांनी लहानपणापासून अस्पृश्यता पाहिली होती,
ते हिंदू महार जातीचे होते, ज्यांना खालच्या दर्जाचे लोक समजले जात होते आणि उच्च जातीचे लोक त्यांना स्पर्श करणे पाप मानत. त्यामुळे आंबेडकरांना समाजात अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागले. या भेदभावाला आणि अपमानाला बळी पडलेल्या आंबेडकरांना ते ज्या आर्मी स्कूलमध्ये शिकायचे, तिथे त्यांच्या जातीतील मुलांना वर्गात बसू दिले जात नव्हते. शिक्षकांनीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. इथे त्यांना पाण्याला हातही लावू दिला जात नव्हता, शाळेचा शिपाई त्यांना वरून ओतून पाणी देत ​​असे, ज्या दिवशी शिपाई आला नाही, त्या दिवशी त्यांना पाणी सुद्धा मिळाले नाही. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती)

वाचा – जाणून घ्या बाबासाहेबांचे सुविचार मराठीमध्ये

ADVERTISEMENT

डॉ. भिमराव आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास (Dr. Babasaheb Ambedkar Education )

प्राथमिक आणि उच्च शिक्षणासाठीही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला होता. त्या काळी दलित मुलांना शाळेत वर्गात बसण्याची आणि पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवण्यासाठी बाबासाहेबांना अनेक कष्ट घ्यावे लागले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण –

वडील भारतीय सैन्यदलात असूनही आर्मी स्कूल मध्येही त्यांना शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. सैन्यदलातील लोकांच्या मुलांना मिळणाऱ्या सवलतींचा त्यांना फायदा झाला. मात्र शाळेत सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. बाबासाहेबांनी अशा परिस्थितीतही त्याचे प्राथमिक शिक्षण दापोलीत पूर्ण केले. या शाळेत त्यांना वर्गात बसण्याची परवानगी मिळाली नव्हती. पुढे वडिलांसोबत साताऱ्याला गेल्यावर पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांनी सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. पुर्वी कोकणातील लोकांमध्ये आडनावे गावावरून ठरत असून त्यापुढे कर लावण्याची पद्धत होती. त्यानुसार त्यांचे नाव आंबवडेकर असे ठेवण्यात आले होत. मात्र उच्चारताना त्रास होत असल्यामुळे पुढे त्याची आंबेडकर अशी नोंद करण्यात आली. साताऱ्यामध्ये चौथीची परीक्षा पास झाल्यावर बाबासाहेब सहपरिवार मुंबईला आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर –

बाबासाहेब १९१२ साली मुंबईतील एलफिस्टन हायस्कुलमध्ये पदवीधर झाले. बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीमान होते. त्यामुळे ते प्रत्येक परीक्षेत ते नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असत. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून मुंबईत पदवी प्राप्त करणारे बाबासाहेब हे पहिले दलित होते. मुंबई विद्यापीठातून त्यांनी अर्थ शास्त्र आणि राजनिती या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली होती. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने त्यांनी फारसी भाषेतून शिक्षण घेतलं. आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या ज्ञातिबांधवांनी त्यांच्या कौतुकाचा एक कार्यक्रम केला होता. कारण त्या काळात एका दलित मुलांने एवढे यश मिळवणे ही एक खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या केळुसकर गुरूजींनी त्यांना स्वतः लिहिलेल्या बुद्धचरित्रातची एक प्रत भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर बाबासाहेबांना बुद्धांच्या शिकवणीबद्दल आकर्षण निर्माण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेब महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतील असं त्यांच्या गुरूजींना वाटत नव्हतं. यासाठीच त्यांनी बाबासाहेबांची भेट महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी करून दिली. बाबासाहेबांची हुशारी पाहुन महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. ज्यामुळे पुढे बाबासाहेब मुंबईतील एलफिस्टन येथे शिक्षण घेऊन पदवीधर झाले. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती)

वाचाबाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी मध्ये

ADVERTISEMENT

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोलंबिया विद्यापीठातून पीएचडी –

बाबासाहेबांना त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे बडोदा संस्थानात राज्य सरकारने रक्षामंत्री बनवलं मात्र तिथेही त्यांना सतत जातिभेदाला सामोरे जावे लागत असे. सतत होणाऱ्या अशा अपमानामुळे बाबासाहेब जास्त काळ या पदावर काम करू शकले नाहीत. पुढे त्यांना न्युयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्चपदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी निघून गेले. १९१५ साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान आणि अर्थशास्त्रातून एम ए ची पदवी प्राप्त केली. प्राचीन भारताचे वाणिज्य या विषयावर संशोधन केले. अमेरिकेतून १९१६ साली त्यांनी यासाठी पीएच डी मिळवली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लंडन विद्यापीठातून उच्च शिक्षण –

अमेरिकेतील फेलोशिप संपल्यावर बाबासाहेब पुन्हा भारतात परतले. मात्र येताना ते स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पॉलिटिकल सायन्स यात एम.एस.सी. आणि डी.एस.सी. शिवय बार एट. लॉसाठी नोंदणी करून आले होते. भारतात आल्यावर सर्वात आधी त्यांनी प्रथम शिष्यवृत्तीच्या नियमानुसार बडोदा राजदरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची नोकरी केली. राज्याचे रक्षा सचिव हे पद सांभाळले. मात्र जातिभेदामुळे त्यांना नोकरी करताना खूपच त्रास सहन करावा लागत असे. नोकरी करत असूनही शहरात भाड्याने घर मिळाले नाही. या त्रासाला कंटाळून त्यांनी ही नोकरी सोडून खाजगी शिक्षक आणि अकाऊंटटचे काम सुरू केले. सल्लागाराचा व्यवसायही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्या काळच्या सामाजिक परिस्थितीमुळे तो करता आला नाही. शेवटी ते मुंबईत आले आणि त्यांनी राजनैतिक अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. नोकरी करत असताना ते त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमवत होते. ज्यामुळे पुन्हा १९२० साली ते लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. १९२१ साली लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅंड पोलिटिकल सायन्स मधून त्यांनी मास्टर पदवी प्राप्त केली. पुढे डी. एस. सी. ही पदवीदेखील मिळवली. जर्मनी विद्यापीठीतून डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास करून ब्रिटिश बारमध्ये बॅरिस्टर चे काम पाहिले. पुढे ८ जुन १९२७ ला कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वैयक्तिक जीवन – Dr. Babasaheb Ambdkar Personal Life In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९०६ साली रमाबाई यांच्याशी विवाह झाला होता. रमाबाई आणि बाबासाहेबांच्या यशवंत नावाचा मुलगा झाला. मात्र १९३५ साली रमाबाईंचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. १९४० साली बाबासाहेबांनाही अनेक आजारांनी ग्रासले होते. मुंबईत या आजारांवर उपचार घेत असताना त्यांची ओळख डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत झाली. सम विचारांमुळे पुढे त्या दोघांनी विवाह केला. डॉ. शारदा यांनी विवाहानंतर स्वतःचे नाव बदलून सविता आंबेडकर असे केले. डॉ. शारदा यांनी आयुष्यभर बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेतली. समाजात त्यांना माई या नावाने ओळखले जाऊ लागले. 

वैयक्तिक जीवन

instagram

ADVERTISEMENT

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य

अस्पृश्यता आणि जातीभेद विरोधी चळवळ (Dalit MoveMent)

डॉक्टरेट मिळवल्यावर भारतात परतून बाबासाहेबांनी जातिभेदाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. समाजकार्य करत अर्थार्जनासाठी त्यांनी वकिली करण्याचे ठरवले. समाजातील अस्पृश्यता आणि जातिभेद कमी करण्यासाठी त्यांनी सक्रिय स्वरूपात काम करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी पहिली केस नाशिक जिल्ह्यातील महार जातीच्या जाधव बंधूंची स्वीकारली. ही केस त्यांनी यशस्वीपणे जिंकली. वकिलीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते यासाठी त्यानी वकिलीसोबत कायद्याच्या प्राध्यापकाची नोकरीदेखील केली. अस्पृश्यतेचा विरोध करण्यासाठी साऊथबरो कमिटीसमोर त्यांनी आपले प्रखर विचार मांडले आणि दलित आणि इतर मागासलेल्या समाजासाठी स्वतंत्र मतदान विभाग आणि आरक्षणाची मागणी केली. जनजागृती करण्यासाठी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शाहू महाराजांनीही यासाठी बाबासाहेबांना नेहमीच सहकार्य केले होते. त्यावेळी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. यासाठीच बाबासाहेबांना महाडमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला. अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. सामाजिक आणि राजकीय लोकांना समाजात समान स्थान देणे हे या सभेचे ध्येय होते. अपृश्यता निवारण्यासाठी त्यांनी केलेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचेही उदाहरण लक्ष्यवेधी होते. काळाराम सत्याग्रह म्हणजे दलितांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजाला केलेले एक आवाहन होते. सामाजिक बदलाची प्रक्रिया हळू हळू होत असते हे माहीत असल्यामुळे बाबासाहेब आयुष्यभर अशा निरनिराळ्या मार्गांनी शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला.

डॉ. आंबेडकरांचा राजकीय प्रवास (Political Journey Of Dr. Babasaheb)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती म्हणजे आंबेडकरांनी १९१९ पासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करण्यास सुरूवात केली होती. कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्यांना १९३० मध्ये लंडन येथील गोलमेज परिषदेत अस्पृशांचा प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पुढे १९३६ साली त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टी निर्माण केली. केंद्रिय विधानसभेत पंधरा जागा त्यांच्या पार्टीने जिंकल्या होत्या. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी या पार्टीचे भारतीय अनुसूचित जाती संघ मध्ये रूपांतर केले. पुढे कॉंग्रेस  आणि महात्मा गांधी यांनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले. मात्र डॉ. आंबेडकरांना हे नाव आवडले नाही त्यामुळे त्यांनी याचा विरोध केला. अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ भारतीय संविधान सभेसाठी च्या निवडणूकीत उत्तम कामगिरी करू शकला नाही. आंबेडकरांनी मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगालच्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून आले. ऑगस्ट १९४७ मध्ये बाबासाहेबांची राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताची राज्यघटना अंमलात आली. भारतीय राज्यघटनेत मोलाचे योगदान असल्यामुळे बाबासाहेबांना पुढे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या नावाने ओळखले जाऊ लागले.  

डॉ. आंबेडकरांचा राजकीय प्रवास

instagram

भारतीय संविधान (Constitution Of India)

डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा मुळ उद्देश देशातील जातिभेद आणि अस्पृश्यता नष्ट करणे हा होता. २९ ऑगस्ट १९४७ मध्ये बाबासाहेब संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ दोन वर्षे अकरा महिने आणि सात दिवसांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधान सादर करण्यात आले. तत्कालिन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या कडे संविधान सुपूर्त करण्यात आले होते. भारतीय संविधानात भारतातील सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात  आला. अस्पृश्यतेला नष्ट केले गेले आणि दलितांसोबतच महिलांनाही समान अधिकार मिळवून देण्यात आला. 

ADVERTISEMENT

डॉ. आंबेडकरांनी का स्वीकारला बौद्ध धर्म – Dr. Babasaheb Ambedkar Accepted Buddhism Marathi

बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी झटले. १९५० साली बाबासाहेब एका बौद्ध सम्मेंलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. त्या ठिकाणी सम्मेंलनात झालेल्या बौद्ध धर्माच्या विचारांनी ते इतके प्रेरित झाले ती त्यांनी पुढे स्वतः बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या सम्मेलनानंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि मगच ते भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अनेक पुस्तके लिहीली. १९५५ साली त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्यानंतरच्या सभेत त्यांनी जवळपास एकाच वेळी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दिक्षा दिली. पुढे ते काठमांडूमधील आयोजित चौथ्या जागतिक बौद्ध सम्मेलनांत सहभागी झाले आणि २ डिसेंबर १९५६  साली शेवटचे ‘दी बुद्धा ऑर कार्ल मार्क्स’ या पुस्तकाची निर्मिती केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक आणि धार्मिक योगदान:

  • मनुस्मृती दहन (1927), महाड सत्याग्रह (वर्ष 1928), नाशिक सत्याग्रह (वर्ष 1930), दलित-दलित आदिवासींच्या मंदिर प्रवेश, पिण्याचे पाणी, अस्पृश्यता, जात, उच्च आणि नीच यांसारख्या सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन यांसारख्या मानवी हक्कांसाठी येवल्याच्या गर्जना. वर्ष 1935) अशा चळवळी सुरू केल्या.
  • आवाजहीन, शोषित आणि अशिक्षित लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी 1927 ते 1956 या काळात मूक नायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत या पाच साप्ताहिक आणि पाक्षिकांचे संपादन केले.
  • त्याच्या डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी (स्था. 1924) द्वारे वसतिगृहे, रात्रशाळा, ग्रंथालये आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी अभ्यास करण्यास आणि उत्पन्न मिळविण्यास सक्षम करणे. 1945 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली.
  • बौद्धिक, वैज्ञानिक, प्रतिष्ठेने 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात 5 लाख लोकांसह भारतीय संस्कृतीसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या शेवटच्या पुस्तक “The Buddha and His Dhamma” द्वारे भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करण्याचा मार्ग मोकळा केला.
  • जातपंत तोडक मंडळ (वर्ष 1937) लाहोर, त्यांच्या प्रबंधाच्या संमेलनासाठी तयार करण्यात आले, त्यांच्या जातिभेद निर्मूलन या ग्रंथाने भारतीय समाजाला धर्मग्रंथांमध्ये प्रचलित असलेल्या मिथक, अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याचे कार्य केले. हिंदू विधेयक संहितेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना घटस्फोट, मालमत्तेत उत्तराधिकार इत्यादींची तरतूद करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आयुष्यभर संघर्ष केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक, आर्थिक आणि प्रशासकीय योगदान

  • डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी – इट्स ओरिजिन अँड रेमेडी अँड हिस्ट्री ऑफ इंडियन बँकिंग अँड बँकिंग या संशोधन पुस्तकाच्या आधारे आणि हिल्टन यंग कमिशनसमोरील त्याच्या पुराव्याच्या आधारे 1935 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.
  • ‘ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताचा विकास’ या त्यांच्या दुसऱ्या संशोधन कार्याच्या आधारे देशात वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली.
  • शेतीमध्ये सहकारी शेतीच्या माध्यमातून उत्पादनात वाढ करणे, सतत वीज व पाणीपुरवठा करणे.
  • औद्योगिक विकास, पाणी साठवण, सिंचन, उत्पादकता आणि कामगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सामूहिक आणि सहकारी प्रगतीशील शेती, राज्याच्या मालकीसह सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताकची स्थापना आणि जमिनीचे राष्ट्रीयीकरण.
  • 1945 मध्ये त्यांनी महानदीच्या व्यवस्थापनाची बहुउद्देशीय उपयुक्तता आणि औद्योगिकीकरणाची बहुउद्देशीय आर्थिक धोरणे आणि नद्या-नाले जोडणारे जल धोरण, हिराकुड धरण, दामोदर खोरे धरण, सोन नदी खोरे प्रकल्प, राष्ट्रीय जलमार्ग, केंद्रीय जल आणि विद्युत प्राधिकरण. बनवण्याचा मार्ग मोकळा झाला
  • 1944 मध्ये प्रस्तावित केंद्रीय जलमार्ग आणि सिंचन आयोगाच्या प्रस्तावाला व्हाईसरॉयने 4 एप्रिल 1945 रोजी मान्यता दिली आणि भारतात मोठ्या धरणाच्या तंत्राच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित केले.
  • त्यांनी भारताच्या विकासासाठी मजबूत तांत्रिक संघटनेची नेटवर्क रचना मांडली.
  • त्यांनी जलव्यवस्थापन आणि विकासाचा मार्ग मोकळा करून देशाच्या सेवेसाठी नैसर्गिक संसाधनांचा अर्थपूर्ण वापर केला.

संविधान आणि राष्ट्र उभारणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 02 वर्षे 11 महिने 17 दिवसांच्या अथक परिश्रमाने समता, समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. एकता, अखंडता आणि व्यक्तिमत्व. गरिमाच्या जीवनशैलीने भारावून गेलेली भारतीय संस्कृती.

1951 मध्ये त्यांनी हिंदू कोड ऑफ वुमन एम्पॉवरमेंट विधेयक मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. सन १९५५ मध्ये त्यांचा Reflections on Linguistic States हा ग्रंथ प्रकाशित करून, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांची पुनर्रचना करून छोट्या आणि आटोपशीर राज्यांमध्ये पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो ४५ वर्षांनंतर काही प्रदेशांमध्ये प्रत्यक्षात आला.

निवडणूक आयोग, नियोजन आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरुषांसाठी एकसमान नागरी हिंदू संहिता, राज्य पुनर्रचना, मोठ्या राज्यांचे लहान आकारात संघटन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, निवडणूक आयुक्त आणि मजबूत केले. राजकीय संरचना मजबूत करण्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परराष्ट्र धोरण.

ADVERTISEMENT

लोकशाही बळकट करण्यासाठी राज्याची तीन अंगे, न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या स्वतंत्र आणि स्वतंत्र केल्या गेल्या आणि समान नागरी हक्कांनुसार एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हा घटक सुरू करण्यात आला.

विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेत अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांचा सहभाग घटनेने निश्चित केला आणि भविष्यात ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज इत्यादी कोणत्याही प्रकारच्या विधिमंडळात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला.

सहकारी आणि सामूहिक शेतीबरोबरच, उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून, सार्वजनिक प्राथमिक उपक्रम जसे की बँकिंग, विमा इत्यादी राज्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून जमिनीवर राज्याची मालकी प्रस्थापित करण्याची आणि अल्प शेतीधारकांवर अवलंबून असलेल्या बेरोजगार मजुरांना रोजगार देण्याची त्यांनी जोरदार शिफारस केली. अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिकीकरण.

बाबासाहेबांनी केले शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि कामगार कल्याण

व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये कामगार मंत्र्यांच्या क्षमतेनुसार, कामगार कल्याणासाठी, कामगारांचा कामाचा वेळ १२ तासांवरून ८ तासांवर आणणे, समान काम, समान वेतन, प्रसूती रजा, पगारी रजा, कर्मचारी राज्य विमा योजना, आरोग्य सुरक्षा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 1937 च्या मुंबई अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामगार आणि दुर्बल घटकांच्या हितासाठी आणि सत्तेत थेट सहभागासाठी त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना करून 17 पैकी 15 जागा जिंकल्या.

ADVERTISEMENT

कर्मचारी राज्य विमा अंतर्गत, आरोग्य, रजा, अपंगत्व-समर्थन, काम करत असताना अपघाती घटनेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि इतर अनेक संरक्षणात्मक सुविधा कामगार कल्याणामध्ये समाविष्ट आहेत.

कर्मचार्‍यांना दैनंदिन भत्ता, अनियमित कर्मचार्‍यांना रजेची सुविधा, कर्मचार्‍यांच्या वेतन श्रेणीचा आढावा, भविष्य निर्वाह निधी, 1944 मध्ये कोळसा खाणीत काम करणार्‍या कामगारांना सुरक्षा दुरुस्ती विधेयक आणि अभ्रक खाणकामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

१९४६ मध्ये त्यांनी कामगार कल्याण धोरणाचा पाया रहिवासी, पाणीपुरवठा, शिक्षण, करमणूक, सहकार व्यवस्थापन आदींपासून घातला आणि तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

कामगार कल्याण निधीच्या अंमलबजावणीसाठी एक सल्लागार समिती स्थापन करून, तो जानेवारी 1944 मध्ये कार्यान्वित करण्यात आला. भारतीय सांख्यिकी कायदा संमत करण्यात आला ज्यामुळे कामगार परिस्थिती, दैनंदिन मजुरी, उत्पन्नाचे इतर स्त्रोत, महागाई, पत, गृहनिर्माण, रोजगार, ठेवी आणि इतर निधी आणि कामगार विवादांशी संबंधित नियम शक्य झाले.

ADVERTISEMENT

8 नोव्हेंबर 1943 रोजी त्यांनी 1926 पासून प्रलंबित असलेला भारतीय कामगार कायदा सक्रिय केला आणि त्याअंतर्गत भारतीय ट्रेड युनियन दुरुस्ती विधेयक प्रस्तावित केले आणि कामगार संघटनेची कडक अंमलबजावणी केली. कामगारांच्या कल्याणासाठी आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी कायदा, कारखाना दुरुस्ती कायदा, कामगार विवाद कायदा, किमान वेतन कायदा आणि कायदेशीर संप कायदे करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके – Dr Ambedkar Books In Marathi

डॉ. बाबासाहेबांची साहित्य संपदा विपूल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती आणि लिखाण असलेल्या या ग्रंथसंपदेमधून आजही ते विचारांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करत आहेत. त्यापेैकी काही निवडक खालीलप्रमाणे

  • भारतातील जाती त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास
  • इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
  • जातीचा विनाश
  • व्हु वेअर दी शुद्राज
  • दी अन्टटचेबल: व्हु वेअर दे अॅंड व्हाय दे बिकेम अनटचेबल
  • थॉट्स ऑन पाकिस्तान
  • दी बुद्ध अॅंड हिज धम्म
  • बुद्ध ऑर कार्ल मार्क्स
  • दी प्रॉब्लेम ऑफ रूपी
  • इस्ट  इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनिती
  • जातिव्यवस्थेचे निर्मूलन
  • संघराज्य विरूद्ध स्वातंत्र्य
  • व्हिच वे टू इमॉन्सिपेशन
  • रानडे गांधी आणि जिन्ना
  • गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ति
  • जातीय पेच  आणि तो सोडवण्याचा मार्ग

या व्यतिरिक्त बाबासाहेबांचे अनेक लेखही प्रकाशित झालेले आहेत. शिवाय त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांच्यावर आधारित अनेक ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार आजही मार्गदर्शक ठरत आहेत.  

बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनोरंजक माहिती – Doctor Babasaheb Ambedkar Information In Marathi

डॉ भीमराव आंबेडकर चरित्राबद्दल हिंदीतील मनोरंजक तथ्ये खाली दिली आहेत-

ADVERTISEMENT
  • ज्या व्यक्तीने भारताच्या ध्वजावर अशोक चक्र ठेवले, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर होते.
  • डॉ भीमराव आंबेडकरांना 9 भाषा अवगत होत्या.
  • भीमराव आंबेडकरांनी वयाच्या २१ व्या वर्षी जवळपास सर्व धर्मांचा अभ्यास केला होता.
  • भीमराव आंबेडकर हे परदेशात अर्थशास्त्रात पीएचडी करणारे पहिले व्यक्ती होते.
  • भीमराव आंबेडकर यांच्याकडे सुमारे 32 अंश होते.
  • बाबासाहेब हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.
  • बाबासाहेबांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवली, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला.
  • भीमराव आंबेडकर हे हिंदू महार जातीचे होते, ज्यांना समाज अस्पृश्य मानत होता.
  • भीमराव आंबेडकर काश्मीरमधील कलम ३७० च्या विरोधात होते.

डॉ. आंबेडकरांचा मृत्यू (Dr. Ambedkar Death)

५ डिसेंबर १९५६च्या रात्री बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा ग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचयाच्या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्याची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांचे निधन झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय ६४ वर्षांचे होते. महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत अनुयायींच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बौध धर्माप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकक यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या कालवधीत देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनमोल असं योगदान दिलं.१९९० मध्ये बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंबेडकर जयंती निमित्त आजही देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. 

FAQ’s – डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती

प्रश्न. भीमराव आंबेडकरांकडे किती पदव्या होत्या?
उत्तर – भीमराव आंबेडकरांना एकूण ३२ अंश होते.

प्रश्न. बाबासाहेबांचा मृत्यू कसा झाला?
उत्तर – बाबासाहेब मधुमेया (मधुमेह) मुळे मरण पावले.

प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत?
उत्तर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

ADVERTISEMENT

प्रश्न. आंबेडकरांचे गुरू कोण होते?
उत्तर – बाबासाहेबांच्या गुरूंचे नाव कृष्ण केशव आंबेडकर होते.

हे हि वाचा,

जाणून घेऊया शिवजंयती अर्थात छत्रपती शिवाजी महाराजची माहिती

लोकमान्य टिळकांची माहिती,सविस्तर माहिती घ्या जाणून

ADVERTISEMENT

अण्णाभाऊ साठे यांची माहिती (Annabhau Sathe Information In Marathi)

महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

11 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT