ADVERTISEMENT
home / बिग बॉस
bigg boss 15

Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेच्या येण्याने हादरले पूर्ण घर

बिग बॉसचे घर (Bigg Boss 15) म्हणजे फक्त वाद. प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे यासाठी वेगवेगळ्या स्पर्धकांना या शो मध्ये सहभागी होता येते. नुकतेच या शो मध्ये राखी आणि तिच्या नवऱ्याने प्रवेश करून धमाल करून सोडली आहे. तर आता एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मराठीतील बिग बॉसमध्ये वादग्रस्त ठरलेला अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) याने प्रवेश केला असल्याचे दाखवण्यात आले आहे. इतकेच नाही तर आल्या आल्या उमर जिथे झोपतो तोच बेड हवा या हट्टामुळे संपूर्ण घर अभिजितने हलवून टाकले असल्याचेही दिसून येत आहे. पण आता पुढे नक्की काय आहे होणार हे आजच्या भागातच कळेल. पण अभिजित, राखी आणि रितेश यांनी आल्यापासूनच घर संपूर्ण हादरवून सोडले आहे हे नक्की. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: दादूस झाले एलिमिनेट, आता होणार चुरशीची स्पर्धा

उमरने दिला नकार

उमर रियाझने (Umar Riaz) या घरामध्ये आपले एक अस्तित्व तयार केले आहे. अप्रतिम खेळणारा उमर नेहमीच आपली मते अगदी परखडपणे मांडतो आणि त्यामुळेच तो प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळेच या खेळातील रथी महारथी समजले जाणारे विशाल कोटियन, जय भानुशाली हेदेखील त्याच्याआधी या शोमधून आऊट झालेले दिसून आले आहेत. तर उमर आपल्या खेळामुळे आणि स्वभावामुळे टिकून राहिला आहे. पण अभिजितच्या येण्याने मात्र आता उमरचं डोकं अधिक तापलेलं दिसून येणार आहे. कारण अभिजितने आल्याआल्या उमर झोपतो तोच बेड आपल्याला हवा असा हट्ट धरला आहे आणि आपण हा बेड सोडणार नाही असं उमरने स्पष्ट सांगितलं आहे. सध्या राखी, रितेश, देवोलिा आणि रश्मी देसाई हे चार जण VIP म्हणून या घरात आले असून अभिजितनेदेखील VIP म्हणून वाईल्ड कार्ड (Wild Card) प्रवेश केला आहे.  व्हीआयपी असो अथवा कोणीही असो आपण आपला बेड सोडणार नाही असा पवित्रा उमरने घेतल्यामुळे आता वादाला नवे तोंड फुटले आहे. पण याचा तोडगा काय असणार आणि अभिजितची मागणी पूर्ण होणार का? या सगळ्याची उत्तरे मिळविण्यासाठी आजच्या भागाची वाट पाहावी लागणार आहे. 

अधिक वाचा – आलिया भट साकारणार करिअरमधील सर्वात छोटी भूमिका

ADVERTISEMENT

राखी आणि राजीवचेदेखील भांडण 

दरम्यान राजीव अदातिया (Rajeev Adatia) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यामध्येदेखील वादाची पहिलीच ठिणगी पडली आहे. आपण व्हीआयपी असल्याने आपण जे काम सांगू तेच राजीवने केले पाहिजे असे फर्मान राखीने काढल्यामुळे राजीव वैतागला आहे. तर आपण हे करणार नाही असंही त्याने सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता बिग बॉसच्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तर अनेकांनी राखी आल्यामुळे आता पुन्हा एकदा बिग बॉस बघायला मजा येणार असंही सांगितलं आहे. सोशल मीडियावर सध्या केवळ बिग बॉसचाच बोलबाला आहे. तर विकेंड वार (Weekend ka war) मध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) यांच्या नात्यावरही आरोप करण्यात आले आहे. मात्र तेजस्वीने हे सर्व आरोप खोडून काढत आपल्याला करणबद्दल मनापासून प्रेम वाटत असल्याचे मान्य केले आहे. तर आता आपण केवळ ट्रॉफी जिंकण्याच्या मागे लागणार असल्याचे करणने सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा करणनीती पाहायला मिळणार असा विश्वास करणच्या चाहत्यांना वाटू लागला आहे. 

अधिक वाचा – एका दिवसात एका चित्रपटगृहात झिम्माचे 18 खेळ हाऊसफुल्ल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT