ADVERTISEMENT
home / मनोरंजन
संग्राम-खुशबूकडे येणार नवा पाहुणा

संग्राम- खुशबू यांच्या घरी येणार नवा पाहुणा, शेअर केला आनंद

मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेला संग्राम आणि अभिनेत्री खुशबू तावडे. हे मराठी इंडस्ट्रीमधील एक बेस्ट कपल आहे. संग्राम समेळ- खुशबू तावडे यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. या दोघांनी नुकतीच ही गोड बातमी शेअर केली आहे. दोघांनी हा फोटो शेअर करत असून त्यांच्या जीवनातील नव्या आनंदाबद्दल सगळ्यांना सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्सना आणि मित्रपरिवाराला खूपच आनंद झाला आहे. दरम्यान,खुशबू ही ‘एक मोहोर अबोल’, तर संग्राम ‘ देवयानी’ मालिकेतून प्रेक्षकांचा चाहता झाला.

सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट चटका लावून जाणारी, सेलिब्सनी वाहिली श्रद्धांजली

पोस्ट शेअर करत दिली बातमी

संग्राम समेळ आणि खुशबू तावडे यांनी एक फोटो शेअर केला त्यामध्ये खुशबू तावडे या दोघांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये खुशबू तावडेचा बेबीबंपचा फोटो शेअर केला आहे.  तिने आता आमच्या कुटुंबात आणखी एकाचे आगमन होणार असे तिने यामध्ये लिहीत संग्रामला टॅग केले आहे. तर संग्रामने देखील पोस्ट शेअर करत खुशबूला टॅग केले आहे. त्यांच्या या फोटोवर खूप जणांचे शुभेच्छासंदेश त्यांना आले आहेत. खूप जणांनी त्यांना फायनली सिक्रेट शेअर केले असे म्हटले आहे.  बेबीबंपच्या फोटोमध्ये खुशबूने एक स्लिव्हलेस टीशर्ट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिचा बेबीबंप अगदी स्पष्ट दिसत आहे.

सिक्रेट केले शेअर

सेलिब्रिटी कपल्सकडे खूप जणांचे लक्ष असते. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केले होते. मालिकांमध्ये एकत्र काम करत असतानाच त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही जोडी खूप जणांना आवडली होती. त्यांनी प्रत्यक्ष लग्न केल्यानंतर खूप जणांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या या लग्नानंतर त्यांच्या घरी कधी गुडन्यूज येईल याची वाट अनेक जण पाहात होते. तो क्षण आलेला आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांच्या घरी हा आनंद आला आहे. खुशबू सध्या मालिकेतून दिसत नसली तरी देखील ती सध्या तिच्या बहिणीसोबत म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे सध्या एक कॅफेसुद्धा चालवत आहेत.

ADVERTISEMENT

हमारी अधुरी कहानी’ #sidnaaz च्या चाहत्यांना दुःख अनावर

धम्माल लव्हस्टोरी

संग्राम आणि खुशबू यांची लव्हस्टोरी ही देखील एकदम हटके आहे. ‘देवयानी’ आणि ‘एक मोहोर अबोल’ या मालिकेत संग्राम आणि खुशबू काम करत होते. या दोघांचे सेट खूपच जवळ होते. त्यामुळे एकमेकांशी बोलणं किंवा दिसणं असं बरेचदा व्हायचं. पण खुशबूला त्यावेळी संग्राम हा फारच अॅटिट्युटवाला माणूस आहे असे सतत वाटायचे. तिला हा खूपच खडूस वाटायचा. पण त्यानंतर त्यांना एका मालिकेत एकत्र काम करण्यायची संधी मिळाली. त्यानंतर तिचे संग्रामबद्दलचे मत पूर्णपणे बदलून गेले. एकत्र मालिकेत काम करताना त्या दोघांना एकमेकांची सवय झाली. मालिकेत खुशबूचे लग्न संग्रामशी झाले नाही. म्हणजे त्या मालिकेतील ट्विस्टमुळे ते लग्न न दाखवल्यामुळे खुशबूने ती मालिका सोडून दिली. त्यामुळे मालिकेत नाही तर त्यांनी प्रत्यक्षात त्यांचा विवाह घडवून आणला आणि हॅपी कपल झाले. 

आता यांच्या घरी नवा पाहुणार येणार म्हटल्यावर आनंद हा द्विगुणित होणारच!

रीना जिंकत आहे ‘मन उडू उडू झालं’ मधून प्रेक्षकांचे मन

ADVERTISEMENT
06 Sep 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT