ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अखेर आदित्य कश्यप बनणार आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक,’माझा होशील ना’ अपडेट

अखेर आदित्य कश्यप बनणार आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक,’माझा होशील ना’ अपडेट

मालिकांमध्ये स्थित्यंतर येऊ लागली की, मालिका या अधिक रंजक होत जातात. सध्या अशाच रंजक वळणावर एक मालिका आहे ती म्हणजे ‘माझा होशील ना’. या मालिकेत आता आदित्य कश्यपसमोर आता खरं काय ते समोर येणार आहे. आदित्य कश्यप हाच आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा मालक असल्याचे त्याला लवकरच सांगण्यात येणार आहे. आदित्यचे मामा त्याच्यासमोर हे सगळं सत्य आणणार आहे. पण त्या आधीच आदित्यच्या जीवनात एक वादळ आले आहे. त्या वादळाला आदित्यला सामोरे जावे लागणार आहे. सई आदित्यचा जीव जेडीपासून वाचवण्याची धडपड दाखवण्यात आली आहे.

अभिनेता दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

जेडीला कळणार सत्य

आदित्य जेडीच्या हाताखाली सध्या काम करत आहे. त्याच्या हातात असे काही कागदपत्र लागले आहेत. ज्यामध्ये त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल काही गोष्टींचा सुगावा लागला आहे. त्याला तो कोण आहे ते कळले आहे. त्याच्या आई-वडीलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या जेडीविरोधात पोलिसांत जाऊन तक्रार करण्याचा त्याचा मनसुबा असतो. तो कागदपत्रही घेऊन जातो. पण जेडीचे गुंड त्याला मधल्या रस्त्यात अडवून त्याला मार देतात. पण सई त्याचे प्राण वाचवण्यासाठी जाते. त्यामुळे थोडक्यात त्याचे प्राण वाचतात. पण आता जेडीला आदित्य हा कोण आहे कळल्यामुळेच या मालिकेमध्ये वळण आले आहे. 

मामा देणार माहिती

आदित्यच्या मामांना आदित्य कोण आहे ? याची खरी माहिती त्यांना कधीपासून द्यायची आहे. पण अद्याप ही गोष्ट त्यांनी कोणालाही सांगितलेली नाही. जेडीने जीवघेणा हल्ला केल्यामुळे आता तरी त्याला खरं काय ते कळायला हवे यासाठी मामा देखील पुढे आले आहेत. आदित्यच्या जीवाला धोका असल्याचे कळल्यामुळे आदित्यला ते पुन्हा एकदा घरी बोलावतात. पण आदित्य घरी येण्यास नकार देतो. त्यामुळे आता मामा आदित्यची मनधरणी कशी करणार. आदित्य पुन्हा घरी परतणार का? या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहे.

ADVERTISEMENT

तारक मेहता का उल्टा चष्माला तेरा वर्षे पूर्ण

मालिकेमध्ये आले वळण

 माझा होशील ना ही मालिका सुरुवातीपासूनच ट्रॅकवर आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक स्थित्यंतरे आली. मालिकेत आदित्य हा खूप मोठा श्रीमंत आहे हे अगदी पहिल्याच एपिसोडमध्ये दाखवण्यात आले. पण त्याच्यापासून त्याच्या हितासाठीच ही गोष्ट लपवण्यात आली आहे. त्यामुळे मालिकेत सई- आदित्यचे प्रेम, त्यांचे लग्न, त्या लग्नाची धडपड असे सगळे दाखवण्यात आले. या सगळ्या धडपडीमध्ये आदित्य आणि त्यांच्या मामांमध्ये झालेली काही किरकोळ भांडणे, कुटुंबात राहताना येणाऱ्या समस्या अशा काही गोष्टी दाखवण्यात आल्या. त्यामुळे या मालिकेतील मुख्य गोष्ट म्हणजेच आदित्य हा खरा कोण आहे? त्याची ओळख ही  त्याला सांगणे. पण अजूनपर्यंत मालिकेत ही गोष्ट कितीतरी वेळा आदित्यला कळेल इतक्या जवळ आली. पण ती आदित्यला कळू शकली नाही असे दाखवण्यात आले. पण आता शेवटी आदित्य समोर सत्य आलेले आहे. ज्या कंपनीत तो नोकरी करतो. त्या कंपनीत त्याला आता  मालकाच्या खूर्चीवर बसवण्यात येणार आहे. 

संस्कृती बालगुडे ठरली डिजीटल इन्फ्लुएन्सर, अभिमानाची बाब

आता लवकरच आदित्य या मालिकेत मालक म्हणून येणार आहे. तो बदल पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT
06 Jul 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT