ADVERTISEMENT
home / मनोरंजन
राहुल वैद्यच्या ‘अली’ गाण्याने केले सगळ्यांना मंत्रमुग्ध, फॅन्सही झाले आनंदी

राहुल वैद्यच्या ‘अली’ गाण्याने केले सगळ्यांना मंत्रमुग्ध, फॅन्सही झाले आनंदी

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राहुल वैद्यची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. स्पष्टवक्ता, प्रेमळ आणि मनपासून मैत्री व शत्रूत्व निभावणारा राहुल या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळाला. अली आणि त्याची मैत्री आतापर्यंत आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. या मैत्रीची आणि अलीच्या प्रेमाची साक्ष देणारा राहुलचा व्हिडिओ आता फायनली रिलीज झाला आहे. राहुल वैद्यचे ‘अली’ नावाचे गाणे युट्युबवर आले असून या गाण्यामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. युट्युब असो वा इन्स्टाग्राम सध्या या गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर या गाण्यामुळे राहुल, अली आणि जास्मिनच्या फॅन्सना देखील आनंद झाला आहे.

अखेर स्वीटुने दिली प्रेमाची कबुली, आता येणार मालिकेत रंगत

अली गाणी झाले अखेर रिलीज

बिग बॉसच्या घरात असताना अली- राहुलची जोडी एकदम हिट झाली होती. मैत्रीसाठी काहीपण करणारे असे हे दोघे होते.  त्यावेळी मिळालेल्या फावल्या वेळेत राखी सावंत, अली गोनी आणि राहुल वैद्य यांनी हे गाणं तयार केलं. सलमान खानसमोरही राहुलने हे गाणे सादर केले होते. हे गाणं घराबाहेर आल्यानंतर नक्की रिलीज करणार असे राहुलने सांगितले होते आणि आता राहुलने  प्रेक्षकांना केला प्रॉमिस पूर्ण केले आहे. त्याने हे गाणे गुरुवारी रिलीज केले असून त्याच्या गाण्याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला आहे. युट्युबवर सध्या याच गाण्याची चर्चा होत आहे. 

अर्जुन कपूरने बांद्रा येथे खरेदी केला आलिशान स्कायव्हिला, किंमत ऐकून व्हाल हैराण

ADVERTISEMENT

विसरला नाही राखी सावंतला

राखी सावंत ज्यावेळी घरात आली त्यावेळी राहुल आणि राखीची एक वेगळी मैत्री पाहायला मिळाली. या गाण्यातल्या सुरुवातीच्या ओळी या राखी सावंतने सुचवलेल्या आहेत. तिचे क्रेडिट द्यायलाही राहुल अजिबात विसरलेला नाही. राहुलने राखीचा उल्लेख अगदी आवर्जून केला आहे. त्याने राखीचे व्हिडिओच्या शेवटी आभार मानले आहेत. त्याच्या या गोष्टीमुळे तो किती उदार मनाचा आणि आपली नाती जपणारा आहे ते यामधून दिसून येते. 

खतरो कें खिलाडीमध्ये राहुल

राहुल वैद्यला बिग बॉसमध्ये पाहिल्यानंतर अनेकांना त्याचा स्वभाव आवडला होता. त्यामुळे तो हा रिअॅलिटी शो जिंकला नाही तरी लोकांची मनं जिंकला होता. त्यामुळे तो बाहेर आल्यानंतर त्याची चर्चा सगळीकडे होते. सध्या राहुलची दोन ते तीन गाणी रिलीज झाली असून आता तो ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे.या शोमध्ये त्याच्यासोबत त्याच्या विरोधात कायम दिसलेला अभिनव शुक्ला आणि निकी तांबोळी हे देखील आहेत. सध्या हे सगळे केपटाऊनला आहेत. या शोचे शूटिंग सुरु आहे. 

 

राहुल कधी करणार लग्न

राहुल आणि दिशा परमार यांचे नाते राहुलने या शो दरम्यानच सांगितले होते. त्याने तिला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोझ केले होते. हा शो संपल्यानंतर त्याने दिशासोबत आपला खूप वेळ घालवला. त्याने नवीन वर्षात आलेले सगळे सण तिच्यासोबत साजरे केले. त्या दोघांचे अनेक फोटोज आणि व्हिडिओही त्यांनी शेअर केले होते. सध्या त्यांनी त्यांच्या लग्नाची कोणतीही तारीख अद्याप सांगितलेली नाही. पण ही दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार हे नक्की! 

ADVERTISEMENT

दरम्यान, तुम्ही जर अली हे गाणंं पाहिलं नसेल तर आताच बघा.

‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये 1 जूनपासून दिसणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाह सोहळा

27 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT