ADVERTISEMENT
home / मनोरंजन
राहुल वैद्य आणि दिशा परमार करणार 16 जुलैला लग्न

राहुल वैद्य आणि दिशा परमार करणार 16 जुलैला लग्न

बिग बॉसचा 14 चा हंगाम गाजवणारा मराठमोळा राहुल वैद्य (Rahul Vaidya) सध्या रोजच चर्चेत असतो. बिग बॉसमध्येच त्याने आपलं दिशावर (Disha Parmar) असणारे प्रेम व्यक्त केले होतो. तिथे गेल्यानंतर दिशाशिवाय आपण राहू शकत नाही असं राहुलने सांगितलं होतं तर अगदी नॅशनल टेलिव्हिजनवर दिशाला त्याने लग्नाची मागणी घातली होती. दिशानेही त्याच्या या लग्नाच्या प्रस्तावाला होकार दिला होता. त्यानंतर ही जोडी कधी लग्न करणार अशी वारंवार विचारणा करण्यात येत होती. तर आता अखेर त्यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. 16 जुलै रोजी आपल्या आप्तेष्ट आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याचे एका वृत्तपत्राने जाहीर केले आहे.  

सेलिब्रिटींचे लग्न आणि घटस्फोट….समाजातील घटकांवर होतो का परिणाम

लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा मेळ

राहुल आणि दिशा हे दोघेही अत्यंत कौटुंबिक वातावरणातील व्यक्ती आहेत. त्यामुळे आपलं लग्न घरातील सर्व माणसांच्या उपस्थितीत आणि आशिर्वादाने व्हावं असंच दोघांनाही वाटत होतं. राहुलच्या म्हणण्याप्रमाणे आमचं लग्न हा नक्कीच आमच्यासाठी खूपच मोठा दिवस आहे. लग्न हे अगदी व्यवस्थित वैदिक पद्धतीने आणि सर्व परंपरासह व्हायला हवं आणि मला माझ्या लग्नात गुरबानी शाबादने गाणं गावं असंही वाटत आहे. तर दिशाने सांगितले की, लग्न म्हणजे दोन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांचा मेळ आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींनी लग्नात असावं हीच माझी इच्छा आहे. आम्हाला दोघांनाही अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे आणि आम्ही तसंच करणार आहोत. सध्या लग्नाच्या तयारीमध्ये दोघेही गुंतले आहेत. राहुल आणि दिशा नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत असतात आणि एकमेकांबद्दल प्रेमही व्यक्त करत असतात. लवकरच या दोघांनी एकत्र यावं अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. 

आणखी एक स्टार किड पदार्पणाच्या मार्गावर, आहे या ज्येष्ठ अभिनेत्याचा नातू

ADVERTISEMENT

दिशाबद्दल प्रेम जाणवले बिग बॉसमध्ये

राहुल आणि दिशा गेले दोन तीन वर्ष एकमेकांचे मित्रमैत्रिण आहेत. पण बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर दिशा आपल्यासाठी खास आहे हे राहुलला जाणवले आणि दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुलने दिशाला नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नासाठी मागणी घातली. दिशासाठी हे सरप्राईज होते त्यामुळे ती अत्यंत आनंदी झाली आणि तिने आपला होकार त्याला कळवला. तेव्हापासून नेहमीच दोघेही अत्यंत आनंदी असून लवकरच आता यांच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. बिग बॉस संपल्यानंतरही राहुल आणि दिशाने तीन – चार महिन्यातच लग्न करू असे सांगितले होते. अखेर आता जुलै महिन्याच्या 16 तारखेला दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राहुल वैद्य सध्या फॉर्ममध्ये असून लवकरच दुसरा रियालिटी शो खतरों के खिलाडीमध्ये दिसून येणार आहे. याचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला असून राहुल सिंहांबरोबर स्टंट करताना दिसून येत आहे. तर राहुलला पाण्याची भीती वाटते आणि पाण्यातील स्टंट त्याला देण्यात आला होता असंही दिसून येत आहे. आता या शो मध्ये राहुल कसा परफॉर्म करतो याचीही त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

संजय लीला भन्सालीच्या ‘हीरा मंडी’त झळकणार सोनाक्षी सिन्हा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT