ADVERTISEMENT
home / मनोरंजन
mazi tuzi reshimgath

बऱ्याच वर्षांनी दिसतेय अशी केमिस्ट्री, श्रेयस-संकर्षणची जोडी आहे कमाल

मराठी मालिकांमध्ये काहीच आता कथानक आणि इतर गोष्टी राहिलेल्या नाहीत असा सूर हल्ली मराठी प्रेक्षकांचा बऱ्याचदा दिसून येतो. मात्र सध्या झी मराठीवरील गाजत असणारी मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath). मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. उत्तम स्टारकास्ट आणि कथानक असणारी ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. मुळात वास्तवाला धरून आणि प्रेक्षकांच्या मनाला पटेल अशीच कथा आतापर्यंत या मालिकेत मांडल्याचे दिसून आले आहे. मात्र सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडेची (Sankarshan Karhade) जोडी. आतापर्यंत ही मालिका चांगल्या नोटवर असून प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. परी (Myra Waykul), नेहा (Prarthana Behere) यांच्या अभिनयासह श्रेयस – संकर्षण ही जोडी जास्तीत जास्त दिसावी असंही अनेकांना वाटत आहे. 

अधिक वाचा – नोव्हेंबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात प्रभावशाली, जाणून घ्या

श्रेयस आणि संकर्षणची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीला

या मालिकेत श्रेयस तळपदे बऱ्याच वर्षांनी काम करत असल्यामुळे मुळातच त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती आणि श्रेयसने ही मालिका स्वीकारली आहे म्हटल्यानंतर यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार हेदेखील गृहीत धरण्यात आलं होतं आणि प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला. तर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा संकर्षणही मालिकेतून दिसून येत आहे. श्रेयस आणि संकर्षण हे अतिशय घट्ट मित्र असल्याचे या मालिकेत दाखविण्यात आले आहे आणि कोणत्याही हिरो आणि हिरॉईनपेक्षा या दोघांची जोडी आणि मैत्री प्रेक्षकांना अधिक भावताना दिसून येत आहे. बऱ्याच कालावधीनंतर टीव्हीवरील मालिकेतून असे काहीतरी नैसर्गिक आणि वास्तवाला जोडणारे दिसून येत आहे याचाच प्रेक्षकांना आनंद आहे. अतिशय नैसर्गिक अभिनयाने या दोघांनीही मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. हलकेफुलके विनोद असोत अथवा कोणत्याही क्षणी एकमेकांना साथ देणे असो दोघेही अत्यंत सहजतेने हा अभिनय साकारताना दिसून येत आहेत. त्यामुळेच कदाचित आपल्या मित्रमैत्रिणीही अशाच आहेत हा एक विचार आपल्या मनाला शिवून जातो आणि म्हणूनच ही जोडी अधिक भावताना दिसून येत आहे. 

अधिक वाचा – अंकिता लोखंडेच्या घरी लगीनघाई, या तारखेपासून सुरू होणार लग्नाचे विधी

ADVERTISEMENT

मोहन जोशींचीही उत्तम साथ 

अनुभव म्हणजे नक्की काय हे या मालिकेतील कलाकारांमुळे प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. ज्याप्रमाणे श्रेयस आणि संकर्षणची केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांना आवडत आहे. त्याचप्रमाणे या मध्ये मोहन जोशी (Mohan Joshi) यांची साथही त्यांना उत्तम लाभली आहे. एक आदर्श आणि तितकाच प्रेमळ आणि कठोर आजोबा म्हणून मोहन जोशींचा सहजपणा मनाला भावतोय. तर संकर्षण, श्रेयस आणि मोहन जोशी यांचे जितके वेळा एकत्र सीन असतात ते नक्कीच मनावर छाप सोडून जातात. आपल्याच घरातील एक अशी ही पात्रं झालेली दिसून येत आहेत आणि म्हणूनच फारच कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. इतकंच नाही तर आम्हाला ही मालिका आवडत असून कृपया कोणत्याही दुसऱ्या ट्रॅकवर ही मालिका नेऊ नका आणि अशीच चांगल्या पद्धतीने ही मालिका हाताळा असेही सोशल मीडियावर अनेकदा नेटकरी कमेंट्सदेखील देताना दिसून येत आहेत. आता नेहा – यश अर्थात प्रार्थना आणि श्रेयसचं लग्न होतं की नाही, समीर अर्थात संकर्षण त्यांना मदत करतो का? शेफाली आणि समीरचं काही जुळणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना आहेत आणि ही उत्सुकता ताणून ठेवण्यात संपूर्ण टीम यशस्वी झाल्याचे आता दिसून येत आहे असंच म्हणावं लागेल.  

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: आविष्कार दारव्हेकर बाहेर,टीम बदलणे पडले महागात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT