ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अजिंक्य राऊतचा झाला अपघात

आयुष्य जगा… का दिला अजिंक्य राऊतने दिला फॅन्सला सल्ला

आपल्याला एक आयुष्य मिळते. आपल्याला मिळालेले आयुष्य प्रत्येकाने जगायला हवे. याचा प्रत्यक्ष अनुभव अभिनेता अजिंक्य राऊतला नुकताच आलेला आहे. दिवाळीसाठी गावी जाताना अजिंक्यचा गाडीचा अपघात झाला. या अपघातातून सगळे थोडक्यात बचावले. कोणालाही गंभीर अशी दुखापत झालेली नाही. पण या एका अनुभवानंतर त्याने त्याच्या सगळ्या चाहत्यांना आयुष्याची किंमत आणि ते जगण्याचे महत्व समजून सांगितले. त्याने अपघातानंतर आणि सेटवर आल्यानंतर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  त्याने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्याच्या काळजीसाठी अनेक मेसेजेस केले आहेत. नेमकं काय झालं होतं त्याच्यासोबत ते जाणून घेऊया. 

Bigg Boss 15: शमिता शेट्टीला मिळतोय का अधिक फायदा, इतर स्पर्धकांवर होतोय अन्याय

गावी जाताना झाला अपघात

मुळचा परभणीचा असलेला अजिंक्य दिवाळीनिमित्त आपल्या गाडीने गावी निघाला होता. गावी जाताना त्याची गाडी रस्त्यावरुन घसरली आणि ती बाजूच्या झाडाझुडपात जाऊन पडली. अपघातानंतर ग्रामस्थांनी त्याची गाडी बाहेर काढायला मदत केली. त्या दरम्यान त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने झालेला हा प्रकार सांगितला आहे. गाडी कमी स्पीडला असूनसुद्धा असे झाले. त्यामुळे काही काळासाठी आम्ही सगळे भान हरपलो होतो. त्यामुळे काही काळ काय झाले ते कळले नाही. गाडी जिथे घसरली तिथे सुदैवाने नदी किंवा काही नव्हते. त्यामुळे आम्हाला काहीही झालेले नाही. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यानंतर त्याच व्हिडिओला जोडून एक संवाद साधलेला आहे. ज्यामध्ये त्याने आयुष्याचे मोल सांगितले आहे. कोणतेही फेम आणि पुरस्कार हे आयुष्यापुढे महत्वाचे नसतात. याची जाणीव असा प्रसंग झाल्यावर येतो. त्यामुळे आयुष्य चांगले जगणे आणि मिळालेल्या आयुष्याचा आनंद घेण्याचा सल्ला त्याने सगळ्यांना दिला आहे. 

पूनम पांडे पुन्हा चर्चेत, पतीविरोधात केली तक्रार

ADVERTISEMENT

मालिकेतून मिळतेय प्रसिद्धी

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून सध्या अजिंक्य राऊत काम करत आहे. त्याच्या या मालिकेत त्याच्यासोबत ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत दिसत आहे. त्याची ही मालिका सध्या चांगलीच सुरु आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आवडीच्या चेहऱ्यामध्ये जाऊन बसला आहे. एक फ्रेश जोडी त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे.

मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचला

 अजिंक्य राऊत याने या आधीही मराठी मालिकांमधून काम केले आहे. त्याने साकारलेली विठू माऊलीची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. त्यामुळेच की काय तो घराघरात जाऊन पोहोचला होता. आता या नव्या मालिकेच्या निमित्ताने त्याचे एक नवे रुप प्रेक्षकांसमोर आले आहे. एक रोमँटीक कॅरेक्टर आणि एक अनोखी लव्हस्टोरी यामध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय अजिंक्य सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशूट करत असतो. 

सध्या त्याला जो अनुभव आला त्यातून त्याने दिलेला संदेश हा प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. 

Bigg Boss Marathi : तृप्ती देसाई पडल्या घराबाहेर, जय सुरक्षित

ADVERTISEMENT
10 Nov 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT