ADVERTISEMENT
home / बिग बॉस
गायत्री- मीराचे डोळे उघडले

Bigg Boss Marathi: गायत्री-मीराचे उघडले डोळे, जय-उत्कर्षवर झाले नाराज

 आठवड्याच्या शेवटची चावडी झाल्यानंतर घरात नेहमीच समीकरणं बदलू लागतात. अगदी तशीच काही समीकरण आता घरात बदलताना दिसत आहे.गायत्री-मीराला जयबद्दलची चुगली कळल्यामुळे त्यांचे डोळे काही अंशी खाडकन उघडताना दिसत आहे. खेळात असताना आपला वापर हा केवळ खेळासाठी केला जात आहे. हे अनेकदा सांगून देखील या दोघींचे डोळे उघडले नव्हते. पण आताच्या वीकेंडला जी चुगली सांगितली त्यामुळे गायत्री-मीरा जय- उत्कर्षपासून थोड्याफार दुरावलेल्या दिसत आहेत. या घरात आता तरी त्यांचा खेळ बदलेल अशी अपेक्षा आहे. त्यातच नव्याने घरात आलेली नीथा शेट्टी कोणाकडे झुकेल असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

Bigg Boss Marathi: आविष्कार दारव्हेकर बाहेर,टीम बदलणे पडले महागात

गायत्री-मीराचे डोळे पाणावले

चावडी झाल्यानंतर गायत्री आणि मीराचे बोलणे झाले. खेळात आपला कसा वापर केला जातो हे गायत्रीसोबत मीराचे बोलणे सगळ्यांनी ऐकले आहे.  त्यामुळे त्यांच्यामध्ये आता कोल्डवॉर दिसून येत आहे गायत्री जयवर नाराज आहे तर मीरा ही उत्कर्षवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. जयला खेळात पुढे जाण्यासाठी मीरा- गायत्रीची गरज नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गायत्री- मीराची मनधरणी करताना फारशी दिसत नाही. त्याचे वागणे हे केवळ खोटे आहे ते देखील दिसत आहे. त्यामुळेच की काय गायत्री- मीराचे डोळे या दोघांमुळे पाणावलेले दिसले आहेत. पण इतके सगळे करुनही यांची मैत्री तुटणार की राहणार अशी शंका आहे.

अंकिता लोखंडेच्या घरी लगीनघाई, या तारखेपासून सुरू होणार लग्नाचे विधी

ADVERTISEMENT

पार पडले नॉमिनेशन टास्क

घरात नॉमिनेशन टास्क अगदी शांतपणे पार पडले आहे. दिवाळीच्या दिवशी हे नॉमिनेशन टास्क असल्यामुळे थोडं वेगळ्या पद्धतीने हा टास्क पार पडला. गायत्री- मीराला आता थोडासा खेळ कळल्यामुळे आता त्यांना योग्य निर्णय घेणे कळू लागले आहे. गायत्रीने जयला नॉमिनेट करुन आपला राग व्यक्त केला आहे. त्यामुळे नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी बिघडले आहे असेच दिसून येत आहे. तर मीराने या टास्कमध्ये मीनल आणि दादूस या दोघांना नॉमिनेट केले आहे. पण आता या दोघांचे डोळे उघडल्यामुळे त्यांचा खेळ एकतर चांगला होईल किंवा खराब होईल असे दिसत आहे. तर नीता शेट्टीने आल्या आल्या जय, सोनाली यांना नॉमिनेट केले आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे उत्कर्षने जय आणि तृप्ती यांना नॉमिनेट केले आहे. तर गायत्रीला सेफ केले आहे.

नीथाचा होईल का पंगा

नीथा शेट्टी घरात आल्यानंतर ती कोणत्या ग्रुपमध्ये जाईल अशी उत्सुकता सगळ्यांना आहे. घरातही जय-उत्कर्ष तिला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. नीथा बाहेरुन गेम बघून आलेली आहे. तिला या खेळात कोणाला सपोर्ट करायचा हे पहिल्या दिवसापासून माहीत असलं तरी देखील ती या खेळात फारच सावध भूमिका घेताना दिसत आहे. तिचा खेळ हा अगदी आताच सुरु झाल्यामुळे हा खेळ सेफ सुरु आहे असेच दिसून येत आहे. त्यामुळे आता नीथाचे गणित कोणासोबत बिघडेल आणि कोणासोबत बनेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 जय-उत्कर्षमध्ये येणार का तणाव

उत्कर्षने या नॉमिनेशनमध्ये जयला नॉमिनेट केले आहे. या आधी या दोघांची मैत्री दिसून आली आहे. उत्कर्ष या आठवड्यात सेफ असल्यामुळे तो या खेळात नॉमिनेट होऊ शकत नव्हता. उत्कर्षने गायत्रीने वाचवताना जयला नॉमिनेट केले. त्यामुळे जयच्या मनात उत्कर्ष उतरला आहे असे दिसून येत आहे. उत्कर्ष आपल्याला नॉमिनेट करु शकत नाही अशी भावना असल्यामुळे जय थोडासा बुजलेला दिसला आहे. या घरात विकासच्या गटाकून अनेक जण बरेचदा नॉमिनेट झालेले आहेत.  पण जय हा त्याच्या स्मार्टनेसमुळे कधीच नॉमिनेट न झाल्यामुळे त्याचे असे बदलेले वागणे स्वाभाविक होते. 

आता या नॉमिनेशनमुळे नेमकं काय होईल? घरात समीकरण बदलतील की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT
02 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT