ADVERTISEMENT
home / बिग बॉस
घऱात आली आजी

Bigg Boss Marathi:घरात सुरु झालेत गैरसमज, टीम Aमध्ये पडेल का फूट?

 वीकेंडची चावडी झाल्यानंतर घरात एकच वादळ उठलं आहे. काही जणांची कानउघडणी केल्यानंतर घरात कोणीच कोणाचे नाही  हे अनेकांना कळून चुकले आहे. टीम A म्हणून घरात वावरणारे जय, गायत्री, उत्कर्ष आणि मीरा यांना चांगलीच बोलणी मिळाल्यामुळे  आता घरात कसे वागायचे? याचे नवे प्लॅनिंग करायला त्यांनी सुरुवात केली आहे.पण आता टीम A मध्ये याच कारणामुळेच फूट पडतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या घरात टिकून राहताना  सगळे अजूनही खेळच खेळतायत हे मात्र प्रेक्षकांना दिसून येत आहे. घरात सतत कुजबूज आणि कोपऱ्यात जाऊन चर्चा करणे आता अधिक दिसू लागले आहे.

Bigg Boss 15: अनुषाच्या येण्याने करणला बसणार झटका की राकेशच्या येण्याने शमिता होणार आनंदी

मीराने उत्कर्षला सांगितले सत्य

मीरा ही अशी सदस्य झाली आहे. जिला दर आठवड्याच्या शेवटी चांगलाच ओरडा मिळत असतो. पुन्हा एकदा महेश मांजरेकरांनी तिची कानउघडणी केल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. पण तरीही मीरा तशीच होती. पण आता या आठवड्यात तिला काही गोष्टी चांगल्याच लागलेल्या दिसत आहे. उत्कर्षसोबत मीराने चुगली बुथमधील चुगली उत्कर्षसोबत शेअर करुन जय काय म्हणाला ते सांगितले. त्यामुळे मीरा आता या घरात थोडी संभ्रमात वापरताना नक्कीच दिसत आहे. दुसरीकडे जय हा स्नेहासोबत अधिक गुंतलेला दिसत आहे.  इतकेच नाही तर दुसऱ्या गटातील लोकांशी कसे वागायचे आणि त्यांना कसे दुर्लक्ष करायचे हे देखील प्लॅन करत आहे. उत्कर्षला आता घरात आपल्याला कोणीच सपोर्ट करत नाही अशी भावना निर्माण झाली आहे. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार केले जात आहे असे वाटत आहे. तर गायत्री कोणीतीही चर्चा आपल्याशिवाय होऊ नये यासाठी सतत जय, उत्कर्षच्या आजुबाजूला फिरताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच या गटात एकमेंकाबद्दल थोडासा संशय दिसून येत आहे. 

6 बॉलीवूड कलाकार हॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी सज्ज

ADVERTISEMENT

घरात आजीचे झाले स्वागत

सुरेखा कुडची यांची एक्झिट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा खेळ सुरु झाला आहे. या आठवड्यात आजी ही सगळ्या घरातल्यांच्या भेटीला आली आहे. आजी या घरातल्या सदस्यांसोबत खेळ खेळणार आहे. काही कसोट्या समोर ठेवून त्यांना हा टास्क खेळायला लावणार आहे. आजी आल्यानंतर पहिला टास्क हा नॉमिनेशनचा पार पडला आहे.  यामध्ये घरात एक  हिरा ठेवण्यात आला. जिनीचा आवाज आल्यानंतर असलेला हिरा हा घेऊन जिनीकडे एक नाव सेफ करण्यासाठी द्यायचे होते. त्यानुसार या कार्यात आदिशने सगळ्यात आधी आविष्कारला सेफ केले. जय आणि उत्कर्ष आणि एकमेकांना सेफ केलेले आहे. तर दादूस यांनी  स्नेहाला सेफ करण्याची संधी दिली. जयच्या आधी पुन्हा एकदा हिरा लागल्यानंतर तिने गायत्रीला सेफ केले आहे. तर मिनलने सोनालीला सेफ केले आहे. उत्कर्षने मीराला सेफ केलेले आहे. मिनलने विशालला सेफ केले आहे. यावेळी संतोष, आदिश, विकास, मिनल हे चार जण नॉमिनेट झालेले आहेत

उत्कर्ष आणि जयमध्ये होणार का भांडण

जय आणि उत्कर्ष यांची मैत्री सगळ्यांनीच अनुभवली आहे. पण आता त्यांच्या या मैत्रीमध्ये काही टास्कमुळे फूट पडेल का? असा प्रश्न दिसू लागला आहे. घरात या नव्या टास्कमुळे काही नवीन समीकरणे दिसू लागली आहेत. मीरा- विशाल हे या टास्कमुळे एकमेकांशी बोलताना दिसत आहे. तर आदिश आणि गायत्री यांच्यामध्येही थोडाफार संवाद दिसून येत आहे.  हा टास्क अजून तरी हसून आणि समजूतदारपणे होत आहे. पण तरीदेखील यामध्ये कधी काय बदल होईल हे काही सांगता येत नाही. 

आता या घरातील नॉमिनेशन टास्कमुळे कोणाची समीकरणं पुन्हा एकदा बदलतील ते पाहावे लागणार आहे. 

Bigg Boss Marathi: का वाढत चालली आहे जयबद्दल नाराजी

ADVERTISEMENT
19 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT