ADVERTISEMENT
home / Uncategorized
बिग बॉस मराठी

Bigg Boss Marathi : चावडीवर घेतली पुन्हा गायत्री-मीराची शाळा, सुरेखा कुडची झाल्या आऊट

 Bigg Boss Marathi च्या घरात आता चार आठवडे पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत या घरातून अक्षय वाघमारे बाहेर पडला आहे तर या घरात वाईल्ड कार्डमधून आदिश वैद्यची एंट्री झाली आहे. शनिवार-रविवार चावडी झाल्यानंतर आता या घरात आठवड्याच्या शेवटी मीराची शाळा घेण्याची प्रथाच आता या सीझनमध्ये झालेली आहे. पण आता यामध्ये आदिशचीही भर पडली आहे. मीराचा एकूण अंदाज पाहता तिला दोन आठवडे दिलेले डोस अजूनही पुरे झालेेले नाही की पुन्हा एकदा आता आदिश मीरची शाळा घेण्याची वेळ आलेली आहे. शिवाय यावेळी घरातून सुरेखा कुडची या कमी मतांमुळे बाहेर पडल्या आहेत

मीराचा उद्धटपणा काही कमी होईना

काहींचा मूळ स्वभाव हा कधीही बदलता येत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री आणि स्पर्धक  मीरा जगन्नाथ आहे. यंदाही मीरावर पुन्हा एकदा ताशेरे ओढण्यात आलेले आहे. मीरा ही अजूनही तिचाच खेळ असल्यासारखे खेळत आहे. ती जे म्हणेल त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि इतरांनी काही केले की ते चुकीचे असे कायम ती दाखवत आहे.  मीराला विशालने  करुया आता कल्ला या टास्कमध्ये प्रेक्षकांवर विश्वास ठेवा असे सांगितले होते. पण तरीही मीरा अजिबात बदलायला तयार नाही. तीन आठवडे तिची शाळा घेऊन सुद्धा ती बदलायला तयार नसल्यामुळे आता मीराची निगेटीव्ह इमेज तयार झाली आहे.हा खेळात टिकून राहण्यासाठी तिने घेतलेले हे बेअरींग तिच्या भविष्यासाठी त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे. 

गायत्रीहीवरही प्रेक्षक नाराज

गोड चेहरा आणि बालिश हसू असलेली गायत्री ही देखील दिवसेंदिवस अनेकांच्या डोक्यात जाऊ लागली आहे. वयाचा मान न ठेवणे आणि सगळ्यांना कायम काहीना काही बोलत राहणे. हा देखील गायत्रीचा गूण आहे. त्यामुळे या दोघी एकमेकांसोबत सतत असल्याचे आणि घरातील काही लोकांना सतत टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच त्यांची घरातील जागा पक्की होत असल्याचे दिसत असले तरी त्यांची प्रतिमा ही घरात राहून खेळाडू नाही तर ग्रुपिझम अशीच दिसून येत आहे. त्यामुळे गायत्रीला अजूनही सुधारण्याची गरज आहे. पण तरीही या दोघींची शाळा घेऊनही  त्यांच्यात आता बदल होईल की नाही याची अपेक्षा नाही.

पहिल्यांदा असते ती चुकी तिसऱ्यांदा नाही- सुरेखा

सध्या घरात स्नेहा आणि जय यांच्यामध्ये काही नाते तयार होताना दिसत आहे. जे आता घरातल्यांच्याही लक्षात आलेले आहे. घरात स्नेहा काही कारणास्तव जयच्या सतत अवतीभवती दिसायला लागली आहे. तिचा खेळ हा पूर्णपणे मागे पडू लागला आहे आणि ती जयमध्ये अधिक गुंतताना दिसत आहे. सुरेखा यांनी आता हे जयला देखील समजावून सांगितले आहे. त्यांनी स्नेहाच्या पूर्वआयुष्याबद्दल सांगून आता पुन्हा ती चूक करायला जात आहे. असे देखील सांगितले आहे.  जयमुळे स्नेहामध्ये होणारा बदल त्यांनाही खटकू लागला आहे.  जर खेळात स्नेहाला टिकण्यासाठी अशापद्धतीचा खेळ सुरु असेल तर ठिक… पण घरात सुरेखा कुडची यांना याचा अंदाज नक्की आला आहे. 

ADVERTISEMENT

आता या चावडीनंतर नेमका काय फरक पडेल ते पाहावे लागेल.

अधिक वाचा

Bigg Boss Marathi: आदिश वैद्यचा पहिल्याच दिवशी जयबरोबर ‘राडा’

Bigg Boss Marathi: का वाढत चालली आहे जयबद्दल नाराजी

ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi : जय-स्नेहामध्ये ‘कुछ तो गडबड है’ की अजून काही

17 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT