ADVERTISEMENT
home / बिग बॉस
वाईल्ड कार्ड एंट्रीने परतले हे स्पर्धक

Bigg Boss Marathi: वाईल्ड कार्ड एंट्रीने पुन्हा आले हे स्पर्धक घरात

ग्रँड फिनाले जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी खेळाची उत्सुकता ही अधिक वाढू लागली आहे. रविवारच्या दिवशी खेळ असा काही पलटला की, घरात वाईल्ड कार्ड एंट्रीने घरातून बाहेर गेलेले जुने सदस्य घरात परत आलेले आहेत. या घरात एक टास्क घेण्यात आला ज्यामध्ये घरातील सदस्यांना बाहेर गेलेल्या सदस्यांमधून काही सदस्यांना परत आणायचे झाले तर कोणाला आणाल, असे विचारण्यात आले होते. त्यानंतर स्पर्धकांनी काही नावे पुढे केली त्यामध्ये प्रकर्षाने अक्षय, तृप्ती देसाई आणि आदिश यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. हा टास्क होता. पण तो टास्क झाल्यानंतर या घरात वाईल्ड कार्ड एंट्रीने स्नेहा, तृप्ती, आदिश   यांची एंट्री झाली आहे. त्यामुळे आता उरलेल्या काही स्पर्धकांना कंबर कसावी लागणार आहे.

लाईव्हमध्ये दिसले हे जुने चेहरे

लाईव्ह खेळ पाहत असणाऱ्यांना या घरातून बाहेर पडलेले सदस्य नक्कीच दिसले असतील. याध्ये स्नेहा, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांचा समावेश आहे. घरातून बाहेर पडलेल्या या सदस्यांना पुन्हा एकदा चॅलेंजर्सच्या रुपात घरात आणले आहे असे साधारणपणे दिसत आहे. त्यांना नेमकं कशासाठी आणले आहे याचा अंदाज अजून आलेला नाही. पण लवकरच हे स्पर्धक घरात दिसणार आहेत. पुन्हा एकदा त्यांचा या खेळात नेमका सहभाग कसा असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय या घरातून बाहेर गेल्यानंतर त्यांना काही स्पर्धकांचे चेहरे नक्कीच दिसले आहेत. त्यानुसार त्यांना खेळणे देखील सोपे जाईल असे दिसत आहे. 

कोणीही दिली नाही पूर्वकल्पना

काही दिवसांपूर्वी अक्षय वाघमारे परत येईल अशा चर्चा रंगल्या होत्या. पण अद्याप तो या घरात आलेला नाही. सगळे स्पर्धक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. या तिघांपैकी आदिश वैद्य याने पोस्ट टाकून तो परत येण्याची माहिती दिली आहे. तो गेला त्यावेळी खूप जण नाराज झाली होती. पण आता तो परतला म्हटल्यावर पुन्हा एकदा राडा होणार तो पुन्हा भिडणार असे दिसू लागले आहे. आता या पुढील टास्क आणि कॅप्टन्सीचे कार्य कसे रंगेल पाहणे मजेदार असणार आहे. 

मीराची पुन्हा घेतली शाळा

मीराची शाळा घेतली नाही असे कधीच होत नाही. दर शनिवारी आणि रविवारी मीराची शाळा ही हमखास घेतली जाते. मीराचा खेळ दिवसेंदिवस खराब होऊ लागला आहे. मीरा ही जय- उत्कर्षसोबत खेळताना आपला खेळ पूर्णपणे विसरुन गेली आहे असे दिसून येत आहे. त्यामुळे तिचे वागणे दिवसेंदिवस खराब होऊ लागले आहे. त्यातच गायत्री- मीराचे जे काही घरात सुरु आहे  त्यामुळे तर आता खेळाला अधिक मजा येऊ लागली आहे. मीरा ही त्यामुळे कुठेतरी वाईट होऊ लागली आहे. हे महेश मांजरेकरांनी तिला सांगून देखील तिच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता मीराची शाळा घेणे हे आता रोजचे झाले आहे. 

ADVERTISEMENT

अभिनेत्री प्रीतम कागणेने ‘विजेता’ चित्रपटासाठी केले तब्बल ६ किलो वजन कमी

यावेळी कोणीही झाले नाही एलिमिनेट

रविवारी कोण जाईल अशी सगळीकडे चर्चा रंगलेली असताना खूप जणांना यावेळी सोनाली किंवा मीरा बाहेर पडेल असे वाटले होते. पण असे काहीही झालेले नाही. कारण यावेळी कोणीही या खेळातून बाहेर पडलेले नाही. मीराला थोडासा धक्का देण्यासाठी तिला शेवटपर्यंत झुलवत ठेवण्यात आले होते. तिने रडून चांगलाच धुमाकूळ घातला. पण शेवटी ती सेफ आहे हे कळल्यानंतर अनेकांना धक्का बसला. काहींना सुखद तर काहींना हा निर्णय अजिबात आवडलेला नव्हता. 

 आता या पुढेे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

06 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT