बॉलीवूड

रणबीर-आलियाने अखेर बांधली लग्नाची गाठ, लग्नासाठी ठरवली होती पीच थीम 

Vaidehi Raje  |  Apr 14, 2022
#RaliaShadi

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअर आणि लग्नाबद्दल प्रचंड चर्चा झाल्यानंतर अखेर आज 14 एप्रिल  2022 रोजी या बॉलिवूडच्या क्युट जोडप्याने लग्नगाठ बांधली आहे. रणबीर आणि आलिया आता अधिकृतपणे पती आणि पत्नी झाले आहेत. बॉलिवूडमध्ये पावर कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडप्याने पारंपारिक सोहळ्यामध्ये सर्व विधीवत शास्रोक्तपणे लग्नगाठ बांधली. हा विवाहसोहळा रणबीर कपूरच्या निवासस्थानी, वास्तू या इमारतीत येथे पार पडलाआणि या सोहळ्याला या जोडप्याच्या जवळची मित्रमंडळी आणि कुटुंबीय उपस्थित होते. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. पण या दोघांनीआणि त्यांच्या कुटुंबीयांनीही याबाबत मौन बाळगले होते. मीडियामध्ये या दोघांच्या लग्नाच्या अनेक वावड्या ,अफवा उठत होत्या आणि कुणालाही त्यांचे लग्न कधी होईल याचा अंदाज येत नव्हता. अखेर काल 13 एप्रिल रोजी गणेश पूजनापासून त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली व त्यानंतर मेहंदी सोहळा पार पडला. आज सकाळीच आलिया व रणबीरची हळद व इतर विधी झाले आणि लग्न कधी होणार या चर्चांना पूर्णविराम लागला.

#RaliaShadi

आलियाने काढले नाजुकसे मेहेंदी डिझाईन 

आलियाने तिच्या लग्नासाठी फार मोठ्या ब्रायडल मेहेंदी डिझाईनची निवड केली नाही. त्याऐवजी तिने तळहातावर नाजुकसे आणि साधे मेहंदी डिझाइन काढले. स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाची मेहंदी छोटीशी असली तरी ते नाजूक व सुंदर डिझाईन होते. तिने तिच्या मेहेंदीमध्ये आर म्हणजेच रणबीर कपूरचे आद्याक्षर आणि 8 हा रणबीरचा जर्सी क्रमांक देखील काढून घेतला. आलियाची मेहेंदी चेंबूरस्थित मेहेंदी कलाकार ज्योती छेडा यांनी काढली. 

आलियाने प्रसिद्ध डिझायनर मित्र मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला ड्रेस या कार्यक्रमासाठी परिधान केला होता. आलिया व मनीष मल्होत्रा हे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे ती त्यांनी डिझाईन केलेला ड्रेस घालणार अशी सगळीकडे चर्चा होती. लग्नाच्या पेस्टल थीमनुसार आलियाच्या मेहेंदीचा ड्रेस हा गुलाबी आणि लाईट टोन्ड होता. मेहेंदीचे संपूर्ण वातावरण मजेदार, हलके आणि जवळपास २-३ तास चाललेल्या पार्टीसारखे होते.या पार्टीत आलियानेही एक-दोन गाण्यांवर डान्स केला तर नीतू कपूर या  ऋषीजींच्या आठवणीत भावनिक झाल्या. 

लग्नाची थीम पेस्टल-पीच 

#RaliaShadi

रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या पारंपारिक विधींच्या आधी त्यांच्या ‘wedding vows’ घेतल्याचे वृत्त आहे. या जोडप्याने लग्नासाठी पीच व पेस्टल थीम ठरवली होती आणि आलियाने मनीष मल्होत्रा ​​आणि सब्यसाची यांनी डिझाईन केलेले पोशाख परिधान केले होते. आलियाचा लेहेंगा सब्यसाची व लग्नाचा दुपट्टा मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केला आहे. हा लेहेंगा पेस्टल हलक्या गुलाबी-पीच रंगाचा आहे आणि दुपट्टा मनीष मल्होत्रा यांनी खास डिझाईन केला आहे ज्यावर खास मेसेज असल्याची चर्चा आहे.तर नीतू कपूर आणि रिद्धिमा यांनी सकाळच्या विधींसाठी अबू-संदीप यांनी डिझाईन केलेले पोशाख परिधान केले. रणबीर आणि आलिया यांच्याबरोबरच लग्नाला आलेल्या सर्व खास पाहुण्यांनीही गुलाबी, पीच असे पेस्टल शेड्सचे पोशाख घातले होते. हे पोशाख मनीष मल्होत्रा यांनीच डिझाईन केले होते. आलियाला नव्या नवरीच्या वेशात बघून करण जोहरला भरून आले. आलिया व करण जोहर यांच्यात जिव्हाळ्याचे नाते आहे त्यामुळे आलियाला नव्या नवरीच्या वेशात बघून करण जोहर स्वतःला भावनिक होण्यापासून रोखू शकला नाही.

रणबीर-आलियाच्या टीमने लग्नाचा तपशील गुप्त ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आलियाचे सुरक्षा प्रमुख मुंबई पोलिसांच्या संपर्कात होते आणि समारंभाचे फोटो लीक होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी घरात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे फोन सील करण्यात आले होते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड