ADVERTISEMENT
home / बिग बॉस
नीथा शेट्टी आऊट

Bigg Boss Marathi:आणखी एका वाईल्ड कार्ड एंट्रीची एक्झिट, नीथा शेट्टी बाहेर

बिग बॉस मराठीच्या घरात आणखी एक एविक्शन पार पडले आहे. दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आत गेलेली निथा शेट्टी साळवी कमी मतांमुळे घराबाहेर पडली आहे. आदिश वैद्य या घरात टिकेल असे वाटत असताना त्याचीही अशीच शॉकिंग एक्झिट झाली होती आणि आता नीथा शेट्टी देखील या घरातून बाहेर पडली आहे. या नव्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री लोकांनी जास्त स्विकारलेली दिसत नाही. हे आता दुसऱ्या इलिमिनेशननंतर दिसून आले आहे. दरम्यान, नीथा शेट्टी या घरातून बाहेर पडल्यामुळे या विकास, सोनाली, विशाल हे सेफ झालेले आहेत. काय काय झालं वीकेंडच्या एपिसोडमध्ये घेऊयात जाणून

Bigg Boss Marathi:पुन्हा दिसून आली विकास-विशालची मैत्री, केला हा त्याग

नीथा झाली नॉमिनेट

घरात क्रमवारीचा टास्क घेण्यात आला. त्या टास्कनुसार घरात पहिल्या क्रमांकापासून ते दहाव्या क्रमांकापर्यंत कोणाचा नंबर लागतो यानुसार उभे राहायचे होते. स्नेहाने यामध्ये पहिले स्थान न सोडल्यामुळे आणि मीनल, गायत्री अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे घरातील उर्वरित सगळे सदस्य नॉमिनेट झाले. यामध्ये विकास, सोनाली, नीथा, दादूस, उत्कर्ष, जय, विशाल असे सगळे नॉमिनेट झाले. या नॉमिनेट सदस्यांपैकी कोण जाईल? अशी चर्चा रंगली होती. बरेचदा वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात आलेल्या स्पर्धकाला याचे नुकसान होते. असे दिसून आले आहे. नीथा वगळता सगळ्यांनी या घरात जास्त काळ घालवला आहे. ते आवडत नसले तरी देखील त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये विशाल, जय, उत्कर्ष आणि दादूस सुरक्षित आहेत हे कळल्यानंतर विकास, सोनाली, नीथा यामध्ये ही चुरस रंगणार होती. पण अनेकांना याचा फटका नीथाला बसेल हे माहीत होते आणि अगदी तसेच झाले या घरातून नीथा बाहेर पडली. 

स्नेहाची घेतली शाळा

स्नेहाने ‘जपून दांडा धर या टास्क’ दरम्यान विकासने धक्का दिला असा कांगावा करुन त्याच्यावर नेहमी धक्का देण्याचे गंभीर आरोप केले होते. पण महेश मांजरेकरांनी विकासची बाजू घेत स्नेहाला आरसा दाखवल्यामुळे अनेकांना समाधान ही मिळाले आहे. विकास नाही तर स्नेहाच विकासच्या अंगावर धडकली हे दिसत असताना देखील स्नेहाने असे करणे चुकीचे होते हे मांजरेकरांनी दाखवल्यामुळेच स्नेहाला आता तरी आपली चूक कळली असेल अशी अपेक्षा आहे. इतकेच नाही तर तिचे आदरयुक्त अहो, तुम्हीने बोलणे गळून पडते हे देखील तिला मांजरेकरांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे यंदा स्नेहाची चांगलीच शाळा घेतली असे म्हणायला हवे.

ADVERTISEMENT

उत्कर्षकडे होतेय का दुर्लक्ष

उत्कर्ष शिंदे या घरात अगदी पहिल्या दिवसापासून खेळ खेळायला आला आहे. त्याने या घरात केलेली मैत्री ही केवळ फायद्यासाठीच असते हे देखील दिसून आले आहे. असे असले तरी देखील त्याची क्रेझ कमी होताना दिसत आहे. घरात तो कायम जयवर अवलंबून असलेला दिसत आहे. घरात कोणताही टास्क असला की, त्याला जयचा पाठिंबा लागतो.त्यामुळेच की काय त्याच्याकडे त्याच्या फॅन्सचेही दुर्लक्ष होईल असे दिसत आहे. त्यामुळे उत्कर्षने आपला खेळ आपल्या जोरावर खेळणे गरजेचे वाटत आहे. 

रोहीत शेट्टी लागला ‘सिंघम 3’ च्या तयारीला, सूर्यवंशीमध्ये दिली होती हिंट

गायत्री- मीरा रोजच्याच

घरात आल्यापासून चावडीवर गायत्री आणि मीराला काही सुनावले जाणार नाही असे मुळीच होत नाही. गायत्री आणि मीरा या घरात कायम ओरडा खातात. सतत एकमेकांबद्दल बोलणे आणि खेळात कायम जय- उत्कर्षवर अवलंबून राहणे यामुळे त्या घरात टिकून असल्याचे दिसतात. पण याच दोघी घरात मसाला आणतात. त्यामुळेच की काय त्यांना शनिवारी-रविवारी ओरडा बसणे आता अगदीच रोजचेच झाले आहे. 

या नव्या सीझनची फिनालेकडे वाटचाल होत असताना आता आणखी कोणाची एंट्री होईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT
15 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT