ADVERTISEMENT
home / Festival
Akshaya Tritiya Information In Marathi

अक्षय्य तृतीयेची माहिती आणि महत्त्व (Akshaya Tritiya Information In Marathi)

अक्षय्य तृतीया हा सण साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. भारतीय हिंदू कालदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडे तीन शुभ मुहूर्त मानले जातात. दसरा, गुडीपाढवा आणि अक्षय्य तृतीया हे यापैकी तीन असून दिवाळी पाडवा हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. या चारही दिवशी कोणत्याही शुभ कार्याचा प्रारंभ करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं मानलं जातं. त्यामुळेच अक्षय्य तृतीयेला मुहूर्त न पाहता शुभ कार्य करण्याची पद्धत आहे. अक्षय्य म्हणजे कधीच नाश न पावणारे त्यामुळेही या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी लग्न, गृह प्रवेश, आर्थिक गुंतवणूक, धार्मिक विधी अथवा सोने खरेदी अशी कोणतीही गोष्ट करणं शुभ मानलं जातं. कारण या  दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते. अक्षय तृतीयेला दान धर्म करण्याचीही प्रथा आहे. यासाठीच जाणून घेऊया अक्षय्य तृतीया महत्त्व आणि माहिती (Akshaya Tritiya Information In Marathi) त्यासोबत सर्वांना द्या अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षय्य तृतीया २०२१ दिनांक आणि शुभ काळ (Akshaya Tritiya Information In Marathi)

भारतीय हिंदू कालदर्शिकेप्रमाणे दर वर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya In Marathi) येते. या वर्षी  १४ मे २०२१ रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असला तरी काही विशेष शुभ कार्यासाठी या दिवसामधील सर्वात जास्त शुभ काळ कोणता हे पाहिलं जातं. या शुभ काळात पूजाविधी आणि शुभकर्मे केली जातात. यंदा अक्षय्य तृतीयेचा शुभ काळ हा सकाळी ५:३८ ते संध्याकाळी ७:५९ पर्यंत आहे असं सांगण्यात येत आहे. अक्षय्य तृतीयेला पहाटे ५:३८ ते दुपारी १२:१८ पर्यंत धार्मिक विधी आणि पूजा अर्चना करणं शुभ ठरू शकतं. 

ADVERTISEMENT

अक्षय्य तृतीयेचा इतिहास (History Of Akshaya Tritiya)

अक्षय्य तृतीया बाबत अनेक पौराणिक कथा पुराणात सांगण्यात आलेल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार या दिवशी सुदामा आपला बालपणीचा मित्र भगवान श्रीकृष्णाच्या घरी  गेला होता. श्रीकृष्णाच्या भेटीसाठी जाताना सुदामा त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार मूठभर पोहे घेऊन गेला होता. मात्र श्रीकृष्णाचे ऐश्वर्य पाहून त्याला त्याची भेट श्रीकृष्णाला देण्याचा संकोच वाटला. भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी आणि मित्रावरील असीम प्रेमामुळे सुदाम्याच्या मनातील घालमेळ ओळखली आणि हट्ट करून सुदाम्याचे पोहे खाल्ले. शिवाय श्रीकृष्णाने आपल्या घरी आलेल्या सुदाम्याचा योग्य आदर सत्कार केला. वास्तविक सुदामा त्याच्या पत्नीच्या हट्टामुळे श्रीकृष्णाकडे आर्थिक मदत मागण्यासाठी गेला होता. मात्र श्रीकृष्णाला भेटल्यानंतर सुदाम्याला इतका आनंद झाला की तो त्याची आर्थिक परिस्थिती आणि संसारातील अडचणी न सांगताच पुन्हा आपल्या घरी परतला. घरी येताच सुदामा आश्चर्य चकित झाला कारण त्याची आर्थिक परिस्थिती अचानक बदलून त्याच्या झोपडीचे भव्य दिव्य राजवाड्यात रुपांतर झाले होते. श्रीकृष्णाच्या किमयेने सारे काही घडले होते हे सुदामाला समजले. मित्र श्रीकृष्णाच्या कृपाशिर्वादाने सुदामा श्रीमंत झाला होता. तेव्हापासून सुख, समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव करणारा हा दिवस अक्षय्य तृतीया या नावाने साजरा केला जाऊ लागला. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला सत्य युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. यासाठीदेखील या दिवसाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाय या दिवशी नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव अशा थोर पुरुषांच्या जन्मदिवसाचा इतिहास आहे. 

अक्षय्य तृतीतेचे धार्मिक महत्त्व (Akshaya Tritiya Religious Significance)

भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. पौराणिक कथांनुसार असं सांगण्यात येतं की,

  • या दिवशी भगवान गणेशाने आणि वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे.
  • अक्षय्य तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. परशुराम हे जमद्ग्नि आणि रेणुकादेवी यांचे पुत्र होते
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि  हयग्रीव यांचाही जन्म झाला होता. 
  • अक्षय्य तृतीयेला सत्य युग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.
  • अक्षय्य तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे या  दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख, समृद्धी नांदते.
  • अक्षय्य तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्रय संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं. 
  • महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रोपदीला ‘अक्षय्य पात्र’ भेट दिले होते.  ज्याला ‘द्रौपदीची थाळी’ या नावानेही ओळखले जाते. द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे. ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही. 
  • असं म्हणतात की, अक्षय्य तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती. 
  • अक्षय्य तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले. 
  • जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 
  • जगन्नाथत पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरूवात केली जाते. 

ADVERTISEMENT

अक्षय्य तृतीयेला केले जाणारे धार्मिक विधी (Rituals During Akshaya Tritiya)

अक्षय्य तृतीया हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण  आहे. या दिवशी सुख समृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक धार्मिक विधी केले जातात.

  • अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चा आणि कडक उपवास केला जातो. 
  • गोर गरिबांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू दान केल्या जातात. 
  • घरात भगवान विष्णूला प्रिय असलेल्या तुळशी पत्राने पाणी या दिवशी घरात शिंपडल्याने सुख शांती नांदते अशी मान्यता आहे. यासाठीच जाणून घ्या जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचा पूजाविधी आणि पौराणिक कथा
  • धनधान्य मुबलक मिळावे यासाठी भारतात अक्षय्य तृतीयेपासून शेतीच्या कामांना सुरूवात केली जाते. 
  • व्यापारी त्याच्या आर्थिक वर्षाच्या हिशोबाची पुस्तके अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवून पूजा करतात. या धार्मिक विधीला हलखता असं म्हटलं जातं. 
  • अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. सोने हे ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते यासाठी या दिवशी आपल्या ऐपतीनुसार थोडे तरी सोने खरेदी केले जाते. असं केल्याने घरातील ऐश्वर्यात वाढ होते असं मानलं जातं. यासाठीच अक्षय्य तृतीयेच्या मंगल दिवशी अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी
  • अक्षय्य तृतीया हा शुभ मुहूर्त असल्यामुळे आणि या दिवशी केलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात.या दिवशी लग्नाचा पवित्र विधी केला जातो. कारण त्यामुळे असे विवाह आयुष्यभर काळ टिकतात अशी मान्यता आहे. 
  • अक्षय्य तृतीयेला नवीन व्यवसाय, बांधकामे आणि नवीन गोष्टींना सुरुवात केली जाते. 
  • अक्षय्य तृतीयेला गंगेत स्नान करणे, यज्ञयाग करणे, दान धर्म करणे शुभ मानले जाते. 
  • जैन बांधव या दिवशी त्यांच्या वर्षभराच्या तपस्येची सांगता उसाचा रस पिऊन करतात आणि शिवाय या दिवशी दिवसभर पूजा आराधना करतात. 
  • आध्यात्मिक प्रवासासाठी हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेपासून योगसाधना करणे, ग्रंथाचे वाचन करणे, मंत्र जपास सुरूवात करणे  शुभ मानले जाते. 
  • भक्तगण या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदनाचा लेप लावतात ज्यामुळे त्या भक्ताला मरणानंतर स्वर्गप्राप्ती होते अशी मान्यता आहे. 
  • पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे कृपार्शिवाद घेण्यासाठी अक्षय्य तृतीया शुभ मानली जाते. यासाठी पूर्वजांना या दिवशी त्यांच्या आवडीचे भोजन अर्पण केले जाते. 
  • काही ठिकाणी हा दिवस आखा तीज म्हणूनही साजरा केला जातो. तीज च्या दिवशी सुहासिनींना सिंदूर दान केल्याने विवाहित जोडप्यामध्ये प्रेम, विश्वास वाढतो असं मानलं जातं.   

You Might Also Like

Akshaya Tritiya Quotes in English

04 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT