ADVERTISEMENT
home / बिग बॉस
अक्षय वाघमारे येणार परत

Bigg Boss Marathi: अक्षय वाघमारे पुन्हा घेणार का एंट्री

Bigg Boss Marathi च्या तिसऱ्या सीझनला त्यांचे 10  फायनलिस्ट मिळाले आहे. शेवटच्या टप्प्याकडे आता या रिॲलिटी शोची वाटचाल सुरु आहे. घरात आतापर्यंत दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या त्याही या घरातून अगदी काहीच दिवस राहून निघाल्या. घरात आता विशाल, जय, विकास, मीनल, उत्कर्ष, मीरा, गायत्री, सोनाली, दादूस, स्नेहा असे दहा स्पर्धक राहिले असताना आता त्यांचे स्थान डळमळीत करायला पुन्हा एकदा या घरात वाईल्ड कार्ड एंट्री प्रवेश घेणार असल्याची चर्चा होत आहे. ही वाईल्ड कार्ड एंट्री अन्य कोणी नाही तर या घरातील आधीचा आऊट झालेला स्पर्धक, डॅडींचा जावई अक्षय वाघमारे आहे. अगदी पहिल्याच दोन आठवड्यात बाहेर पडलेला अक्षय या घरात एंट्री घेणार असल्याची एक हिंट त्यानेच त्याच्या पोस्टवरुन दिली आहे. ही नक्की पोस्ट काय आहे घेऊयात जाणून 

अक्षयची ती पोस्ट चर्चेचा विषय

अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने पोस्ट शेअर करत  दोन नवीन सदस्य,दोन वाईल्ड कार्ड एंट्री, दोन आठवड्यात घराबाहेर… असा फोटो शेअर करताना त्याने त्या खाली कॅप्शन लिहिली आहे की, घरात नवीन सदस्यांची वाईल्ड कार्ड एंट्री घेण्यापेक्षा या घरात राहून गेलेल्यांना जर संधी मिळाली तर? तुम्हाला काय वाटतं ? अशा आशयाचे हे पोस्ट असल्यामुळे कदाचित अक्षय वाघमारे ही संधी साधून पुन्हा एकदा घरात येणार की काय अशी शक्यता आहे. जनतेचा कौल घेण्यासाठी त्याने ही पोस्ट केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अक्षय दिसेल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे.

अक्षयने घेतली सुरेखा आणि तृप्ती देसाईंची भेट

ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय वाघमारे तृप्ती देसाई आणि सुरेखा कुडची यांच्यासोबत दिसत आहे. या घरातून अगदी काहीच दिवसांपूर्वी तृप्ती देसाई बाहेर पडल्या आणि त्याआधी सुरेखा कुडची. आता हे तिघेही या घरात परत येणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण इतर कोणाच्याही अकाऊंटवर अशा हालचाली दिसून येत नाही. तृप्ती देसाई यांना हा खेळ चांगला कळला होता. पण सुरेखा कुडची यांना हा खेळ शेवटपर्यंत कळलाच नाही. त्यामुळेच त्यांना या खेळात टिकता आले नाही.

अक्षयला मिळाला नाही वेळ

अक्षय वाघमारेची धमाकेदार एंट्री सगळयांना आवडली होती. तो या घरात सगळ्यांना चांगलाच भारी पडेल असे देखील वाटले होते. पण अक्षय खेळात तितकासा दिसून आला नाही.या घरात असलेल्या एका ग्रुपमध्ये तो सतत वावरताना दिसल्यामुळे त्याचा खेळ खल्लास झाला असे अनेकांचे म्हणणे आहे. भांडणांपासून अलिप्त राहणारा अक्षय पहिल्या आठवड्यात चांगला दिसला पण त्यानंतर तो थोडा बुजला होता. त्याचाच परिणाम त्याच्या वोटींग्सवर झाला आणि तो या घरातून बाहेर पडला. पण आता तयारीत जर तो पुन्हा एकदा एंट्री करणार असेल तर त्याचा आनंद हा सगळ्यांनाच असणार आहे. 

ADVERTISEMENT

तुम्हाला काय वाटतं अक्षय वाघमारे आता या खेळात टिकू शकेल का?

अघिक वाचा

एकता कपूरने केली ‘नागिन 6’ ची घोषणा, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

सिद्धार्थच्या आठवणीत शहनाज झाले अश्रू अनावर

ADVERTISEMENT

अभिनेता आर्यन हगवणेचा लक्षवेधी लुक ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

17 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT