ADVERTISEMENT
home / बिग बॉस
आता होणार नवा राडा

Bigg Boss Marathi:घरात आलेत देवदूत आणि राक्षस, होणार राडा

 Bigg Boss Marathi च्या घरात आता नवा राडा सुरु झाला आहे. नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता घरात साप्ताहिक कार्य सुरु झाले आहे. या कार्यातून कॅप्टन निवडण्यात येणार आहे. या घरात जेव्हा जेव्हा कॅप्टन निवडण्याची वेळ आली आहे. त्या त्या वेळी या घरात केवळ राडे झालेले पाहायला मिळायले आहेत. मंगळवारी झालेल्या एपिसोडमध्ये या घरात दोन टीम करण्यात आल्या आहेत.एक टीम आहे देवदूतांची तर दुसरी टीम आहे ती म्हणजे राक्षसांची. आता या घरात ना कोणीही देवदूत आहेत ना राक्षस त्यामुळे टास्क दरम्यान पहिल्या दिवशी राडा झाला नसला तरी दुसऱ्या दिवशी होणार नाही अशी शाश्वती देता येत नाही. कारण देवदूतांना राक्षस होण्याची संधी अजून मिळायची आहे. त्यामुळे राडा हा होणार यात काही शंका नाही

पहिल्या दिवशी प्लॅनिंगने झाले स्पर्धक वाद

मंगळवारी घरातील स्पर्धक विकास, मीनल, उत्कर्ष, दादूस, स्नेहा,गायत्री हे राक्षस झाले होते. तर विशाल, मीरा, तृप्ती, जय,आविष्कार, सोनाली हे देवदूत झाले होते. देवदूतांना गार्डनमध्ये बांधलेल्या चौथऱ्यावर महामेरु रचायचा होता. तर राक्षसांना तो तोडायचा होता. त्यामुळे साहजिकच राक्षसांनी यामध्ये आपला फायदा साधत एक एक स्पर्धकाला वाद केले. सगळ्यात शेवटी यामध्ये  राहिलेले स्पर्धक तृप्ती आणि सोनाली आहेत. जय दुधाणे याला या खेळात चिडवण्याची संधी एकानेही सोडलेली नाही. हा खेळ जयला फारसा जमला नाही. त्याने आपला राग अनावर करत दुसऱ्या दिवशी आम्हीही असेच खेळू असे म्हणत दुसऱ्या दिवशीचे चॅलेंज पुढे होणाऱ्या देवदूतांना दिले आहे. जयच्या या अशा बोलण्यामुळे नक्कीच राडा होईल यात काहीही शंका नाही.

कोण होईल घरचा नवा कॅप्टन?

 हे सगळे साप्ताहिक कार्य घरचा नवा कॅप्टन होण्यासाठी सुरु आहे. आतापर्यंत या घरात कॅप्टन निवडतानाची प्रक्रिया कधीही सोपी आणि पटकन होणारी नव्हती. प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करुनच या घरात कॅप्टन झाला आहे. आता उत्कर्ष- जय कॅप्टन पदाची उमेदवारी त्यांच्या गटातील कोणाला कॅप्टनशीप देतील याची चर्चा सुरु झाली आहे. कारण आतापर्यंत कॅप्टन बनवण्याचे सगळे निर्णय या दोघांनी घेतल्यामुळे पुन्हा एकदा नवा कॅप्टन कोण बनेल याची चर्चा होऊ लागली आहे.

जय विरुद्ध होणार का गायत्री आणि मीरा

घरात काही समीकरणं नव्याने जुळताना दिसत आहेत. जय- स्नेहा यांची वाढत जाणारी मैत्री खूप जणांना जास्त दिसू लागली आहे. मीरा- गायत्री यांनी जयसोबत असलेले स्नेहाचे नाते अजिबात आवडत नाही असे दिसून येत आहे. यापुढे कोणत्याही टास्कमध्ये मीरा- गायत्री स्नेहाला पाठिंबा देणार नाही, असे म्हटल्यामुळे आता जय आणि गायत्री-मीरा यांच्या नात्यात नक्कीच एक ताण निर्माण होताना दिसत आहे. या चार जणांची जोडी नाहक जय-स्नेहाच्या जवळीकपणामुळे तुटणार असे स्पष्ट दिसत आहे. या आधीही चुगली बुथच्या माध्यमातून जय गायत्रीबद्दल काय विचार करतो हे दाखवण्यात आले आहे.  त्यामुळे आता या चौघांच्या नात्यामध्ये स्नेहामुळे तडा जाईल का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ADVERTISEMENT

 आता याचा शेवट राड्यामध्ये होईल की सगळे काही आलबेलं होईल हे पाहणे फारच औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अधिक वाचा

भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ होणार नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित

कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’चं शूटिंग सुरू, अल्लू अर्जूनच्या ‘या’ चित्रपटाचा रिमेक

ADVERTISEMENT

रोहीत शेट्टीने दिली रणवीर सिंहला धमकी, म्हणाला ‘सूर्यवंशी’मधील…

27 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT