ADVERTISEMENT
home / बिग बॉस
सोनाली पाटील एलिमिनेट

Bigg Boss Marathi: फिनालेच्या इतक्या जवळ असताना सोनाली पाटील झाली एलिमिनेट

फिनालेला अवघे काहीच दिवस उरलेले असताना सोनाली पाटीलचे घरातून एलिमिनेट होणे अनेकांना धक्का देणारे होते. अधिक चुरशीच्या होत चाललेल्या या सामन्यातून आता सोनाली पाटील बाहेर पडलेली आहे. त्यामुळे आता घरात केवळ विकास, विशाल, मीनल, मीरा, जय आणि उत्कर्ष इतकेच खेळाडू राहिले आहेत. या सहामधून आता टॉप 5 स्पर्धकांची निवड होणार आहे. या खेळात विशाल हा वरच्या स्थानावर असून विकासही वोटींगमध्ये पुढे आहे. पण सोनाली पाटीलचा फॅन फॉलोविंग चांगला असताना आता विजयाच्या इतक्या जवळ येऊन तिला जो फटका बसला ते पाहून घरातील अनेकांना धक्का बसला आहे. या खेळातून आता सोनाली पाटील एलिमिनेट झाली आहे. 

” A फक्त तूच’ चित्रपटात ऋषिकेश वांबुरकर महत्त्वपूर्ण भूमिकेत

सोनाली होती ट्रेंडमध्ये

सोनालीने अगदी मोजकीच कामे केली असतील. पण कोल्हापुरी ठसका आणि तिचा तो साधेपणा अनेकांना भावला होता. तिचा फॅन बेस हा चांगलाच जबरदस्त होता. त्यामुळेच ती आतापर्यंत या खेळात टिकून होती. या आठवड्यात घरातून बाहेर पडण्यासाठी विकास, उत्कर्ष, सोनाली आणि मीरा हे नॉमिनेट झाले होते. त्यामुळे टांगती तलवार ही मीरा आणि सोनाली या दोघींवर होती. सोनाली ही आतापर्यंत वोटिंगमध्ये चांगलीच पुढे होती. पण यावेळी ती मागे पडल्यामुळे तिचा या घरातील प्रवास हा संपुष्टात आला आहे. पण असे असले तरी देखील तिला आतापर्यंत चांगलाच पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळेच काय ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये होती.

झाल्या या चुका

सोनाली या घरात काय बोलते? कोणते मुद्दे कसे मांडते? हे आतापर्यंत कोणालाही कळलेलं नाही. घरात अनेकदा भांडताना तिच्याकडे चांगले मुद्दे असूनसुद्धा तिला केवळ न मांडता आल्यामुळे अनेकदा तिच्या गोष्टी कोणालाही कळत नव्हत्या. त्यामुळे तिला खूप वेळा महेश मांजरेकरांचा ओरडाही बसला. घरात असताना ती टास्क खेळत नाही म्हणून खूप जणांनी तिच्यावर शाब्दिक वार केले होते. पण तरीही त्याही परिस्थितीत ती टिकून राहिली आणि तिने आपला खेळ सुरु ठेवला होता. पण गेल्या काही दिवसात विशाल आणि मीनलसोबत असलेली तिची भांडणे खूप  जणांना अजिबात कळली नव्हती. त्याचे नुकसान कदाचित तिला जास्त झाले असावे.

ADVERTISEMENT

फॅन्ड्रीची शालू होतेय दिवसेंदिवस बोल्ड, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज

विशालला मिळाले फिनाले तिकिट

बिग बॉसच्या घरात टिकून राहणे हे एक चॅलेंज आहे. या घरात 80 हून अधिक दिवस काढल्यानंतर कोणालाही हा खेळ जिंकायलाच हवा असे वाटल्यावाचून राहणार नाही. या घरात फिनालेसाी जो टास्क रंगला त्यामध्ये विशाल निकम विजयी झाला आणि तो थेट फिनालेला पोहोचला आहे. त्यामुळे आता नॉमिनेशनपासून वाचण्याची त्याला काहीही गरज लागणार नाही. तर उत्कर्ष, मीरा, मीनल, विकास, जय यांनाच आता या घरात टिकून राहणे गरजेचे असणार आहे. सोनाली या घरातून बाहेर पडल्यानंतर आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.  

या घरातून सोनाली बाहेर पडल्यानंतर विशाल, विकास, मीनल यांना अश्रू अनावर झाले.  कितीही भांडणं होत असली तरी देखील त्यांची मैत्री या खेळात दिसल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला होता. एकमेकांशी गोड बोलण्यापेक्षा अगदी रोज नित्यनेमाने भांडणं आणि एकमेकांना सावरुन घेणे यामुळे ते लोकांच्या जवळ राहिले. 

19 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT