बिग बॉस

Bigg Boss Marathi : फिनालेकडे घौडदौड सुरु,अनेक समीकरणे बदलली

Leenal Gawade  |  Dec 14, 2021
बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीचा फिनाले जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतशी उत्सुकता अधिक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात गायत्री दातार बाहेर पडल्यानंतर आता घरात राहिलेल्या विशाल, विकास, उत्कर्ष,जय,मीनल, मीरा, सोनाली यांच्यामध्ये आता चांगलीच स्पर्धा रंगली आहे. हे तिकिट कोणाला मिळेल? आणि कोणता स्पर्धक या खेळात टिकेल या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण फिनालेच्या इतक्या जवळ आल्यानंतर खूप जणांची समीकरणं बदलेली आहेत. ती पाहूनही खूप जणांना आश्चर्य वाटत आहे. पण खेळाच्या शेवटी अशी समीकरणं बदलताना अनेकदा दिसतात.जाणून घेऊया हा आठवडा का असणार एवढा रंजक

असा पार पडला अंकिताचा स्वप्नवत साखरपुडा

समीकरणं लागलीत बदलू

घरात अगदी पहिल्या दिवसापासून काही ग्रुप दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने ग्रुप A आणि B  असे सतत दिसून आले. पण गेल्या एक आठवड्यापासून घर एकदम शांत झाले आहे. आता प्रवास संपत आला म्हटल्यावर घरातील रुसवे-फुगवे विसरुन सगळ्यांनी एकोप्याने राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे घरात तशी बऱ्यापैकी शांतता आहे. गायत्री दातार घरी असताना तिने अचानक आपला ग्रुप सोडून दुसऱ्या गटात जाणे पसंत केले होते. त्यानंतर आता घरात मीरा देखील थोडी बदलताना दिसली आहे. घरात शेवटचे नॉमिनेशन कार्य पार पडताना तिच्या मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत यामुळे तिचे घरात उत्कर्ष आणि जयसोबत बिनसलेले दिसत आहे. 

मीनल- विशालमध्ये दुरावा

मीनल- विशाल यांची मैत्री घरात चांगली दिसून आली होती. पण आता तिच्यामध्येही बदल झाले आहेत. घरात एकी नसलेला ग्रुप म्हणून विकास, विशाल, सोनाली, मीनल दिसले. त्यांनी एकत्र खेळ न खेळल्यामुळे कायम समोरच्या गटाला त्याचा फायदा झाला. आताही घरात क्षुल्लक कारणामुळे मीनल-विशालमध्ये दुरावा आला आहे. त्यांच्यामधील भांडण काही केल्या मिटताना दिसत नाही. विशालचे मनावर घेणे आणि मीनलचे न समजावता येणे यामुळे हा गोंधळ झालेला दिसला आहे. पण याच गोष्टीमुळे या ग्रुपमधील अनेक जण ट्रोल देखील झाले.

Bigg Boss Marathi: गायत्री दातारची एक्झिट,अनेकांना बसला धक्का

उत्कर्षने बदलला खेळ

संपूर्ण सीझनमध्ये उत्कर्ष हा कायम काहीना काही डोकं लावताना दिसला आहे. त्याला अनेकदा ब्राऊनी पॉईंट कमवायला सांगूनही त्याला कळले नाही. पण गेल्या काही आठवड्यापासून लोकांची मत आणि लोकांच्या मनात घर करण्यासाठी त्याने एक वेगळाच खेळ सुरु केला आहे. तो आता अधिक सावध खेळताना दिसतो. पण ये पब्लिक है सब जातनी है… त्यामुळे उत्कर्षचा हा खेळही अनेकांच्या लक्षात आला आहे. 

सोनालीला शेवटपर्यंत येईना समजावता

सोनाली या घरात कायम चर्चेत असते.पण सोनालीला आपले मु्द्दे आतापर्यंत कधीही मांडता आलेले नाही. अनेक चांगल्या मुद्दयांवर तिला बोलायचे असायचे पण अनेकदा तिच्याकडून महत्वाच्या मुद्द्याला बगल देण्यात आलेली आहे. त्यामुळेच तिच्या अनेक गोष्टी खूप जणांना कळल्या नाहीत. पण प्रेक्षकांच्या मतामुळे ती या घरात अजूनही टिकून आहे. 

आता फिनालेची घौडदौडीमध्ये कोणालाप पुढे जाण्याची संधी मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read More From बिग बॉस