बिग बॉस

Bigg Boss Marathi: मीराने केले विकासवर आरोप, नेटकऱ्यांमध्ये पिकला हशा

Leenal Gawade  |  Nov 23, 2021
स्नेहा पाठोपाठ मीराचे आरोप

धक्का मारणे… बुक्की मारणे असे काही आरोप आता बिग बॉसच्या घरात नवे राहिलेले नाहीत. घरातून स्नेहा बाहेर पडली असली तरी आरोप करण्याची जागा आता मीराने घेतली आहे असे दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी विकासवर स्नेहाने मुद्दाम धक्का मारतात, असे विकासविषयी म्हटले होते. तर आता त्यामध्ये आणखी भर म्हणून की काय मीराने विकासवर थेट पोटात बुक्की मारुन गेल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये हशा पिकला आहे. सोशल मीडिया पेजवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी मीराचीच उलट शाळा घेत तिला घरातून बाहेर काढून टाका असे म्हणत तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे. नेमकं काय झालं ते घेऊया जाणून

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघने विकासवर केले गंभीर आरोप, प्रेक्षक नाराज

विकासवर वर पुन्हा एकदा आरोप

घरात नॉमिनेशन टास्क हे चांगलेच रंगले आहे. नॉमिनेशन एक्सप्रेसमध्ये ज्याचे तिकिट टिकून राहील तो यातून वाचणार होता. घरात टीम A आणि टीम B ही आधीपासूनच स्पष्ट दिसून आली आहे. त्यामुळे या खेळात काय होईल याचा अंदाज होता. खेळात टीसी होणाऱ्याला कोणाचे तिकिट कापता येईल याचा अधिकार मिळणार होता. एका फेरीदरम्यान विकास, मीरा, उत्कर्ष आणि सोनाली धावत असताना मीराने विकासने मारल्याचा कांगावा केला. विकासने पोटात बुक्की मारली असा आरोप केला. तुला असंच खेळायचं आहे का? असे म्हणून तिने मुद्दा बनवायचा प्रयत्न केला खरा. पण विकासने तिला चांगलेच उत्तर दिले. घरातील इतर कोणीही हा मुद्दा उचलला नाही. पण सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली. मीराने आरोप केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मात्र हशा पिकला आहे. अनेकांनी व्हिडिओ खाली कमेंट करुन तिला लागले असेल तर खेळातून बाहेर काढा, मीराला शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावे अशा कमेंट्स करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या चावडीवर मीराची पुन्हा एकदा कान पिळवणी होणार आहे यात काही शंका नाही. स्नेहानेही असेच आरोप करुन ओरडा ओढवून घेतला होता. आता मीराचेही तेच होणार असे दिसत आहे.

ये पब्लिक है सब जानती है

प्रेक्षकांना सगळ्या गोष्टी या दिसत असतात. त्यामुळे आत कितीही खेळ आणि राजकारण सुरु असले तरी देखील प्रेक्षकांना सगळे काही दिसत आहे. गेल्या आठवड्याचे नॉमिनेशन टास्क जय आणि उत्कर्षच्या टीमला भारी पडले होते. त्यामुळे या आठवड्यात त्यांना संधी मिळाल्यानंतर ते दुसऱ्या गटातील टीमला नॉमिनेट करण्याची एकही संधी जय आणि उत्कर्ष यांनी सोडलेली नाही. त्याचा परिणाम असा झाला आहे की यामध्ये मीनल, सोनाली आणि विकास हे नॉमिनेट झाले आहेत. या शिवाय दादूस आणि मीरा हे देखील नॉमिनेट झाले आहेत. या घरात मीनलविषयी जय आणि उत्कर्ष यांना चांगलीच भीती वाटते. त्याचा परिणाम हा नेहमी नॉमिनेशनमध्ये दिसून येतो. त्यामुळे उत्कर्षला मास्टर माईंड अशी उपमा देण्यात आली नसली तरी देखील तो या खेळात घाबरुन आणि पाठीमागून खेळतो असे दिसतो. उत्कर्ष हा कोणाचेही ऐकत नाही तो उद्धट आहे असे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे आता अनेकांना उत्कर्षचाही कंटाळा येऊ लागला आहे.

फेअर नाही ही फक्त शिंदेशाही

घरात सध्या शिंदेशाहीच सुरु आहे असे सुरुवातीपासून दिसून आले आहे. त्यामुळे या सीझनवर टीका करण्यात येत आहे. उत्कर्षला अनेकदा सांगूनही खूप वेळा तो हे करताना दिसून आला आहे. फेअर गेमच्या नावाखाली ते सतत काहीतरी चुकीचे करताना दिसत आहेत. ज्याचा आता कंटाळा येऊ लागला आहे. या सीझनमध्ये जर जय आणि उत्कर्षच राडे, झगडे करुन जिंकणार असतील तर आता खूप जणांना या सीझनचा विजेताही कळू लागला आहे. 

आता येत्या काळात काय होईल याची उत्सुकता खूप जणांना आहे.

Bigg Boss Marathi: स्नेहा वाघ झाली एलिमिनेट

Read More From बिग बॉस