ADVERTISEMENT
home / बिग बॉस
विकास-विशालच्या मैत्रीत फूट

Bigg Boss Marathi: विशाल-विकास आमनेसामने,मैत्रीत पडेल का फूट

 बिग बॉसच्या घरात कोणताही टास्क राड्याशिवाय होईल असे मुळीच होणार नाही. घरात सुरु असलेल्या देवदूत विरुद्ध राक्षस या टास्कदरम्यान मंगळवारी झालेल्या भांडणापेक्षाही मोठे राडे बुधवारी पाहायला मिळाले आहेत. पहिल्यांदा राक्षस झालेले देवदूत झाले आणि त्यांनी जो गोंधळ घातला त्यामुळे विकास-विशालचे नाते पणाला लागण्याची शक्यता आहे. ज्यावेळी राक्षस म्हणून विशालला खेळायची संधी मिळाली त्यावेळी त्याने विकासला त्रास देण्याची एकही संधी सोडलेली दिसत नाही. खेळात असताना विशाल निकम हा फक्त खेळतो. पण विकासशी असे वागल्यामुळे या दोघांच्या मैत्रीत फूट पडेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ही दोस्ती तुटायची का?

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या देवदूत विरुद्ध राक्षस असा टास्क रंगलेला आहे. यामध्ये राक्षसांना देवदूतांना त्यांचा टास्क पुरा करु द्यायचा नाही. पहिला दिवस टास्क झाला त्यावेळी इतका राडा झाला नाही. पहिल्यांदा राक्षस झालेल्या टीमने शाब्दिक त्रास अधिक दिला. पण दुसऱ्या दिवशी जय, विशाल, तृप्ती, मीरा यांच्या गटाला ज्यावेळी राक्षस होण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. या टास्कचा संचालक विकास होता. त्यामुळे देवदूत झालेल्या विशालला त्याने टास्कमधून बाहेर काढले याचाच राग मनात ठेवून विशालने दुसऱ्या दिवशी राक्षस झाल्यावर सगळ्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडलेली नाही. विशालने त्रास देण्यासाठी सगळ्या काही ट्रिक्स आजमावल्या. त्यामध्ये विकासला इतका त्रास झाला की, या दोघांची आमने सामने भांडणं झाली. इतके दिवस विचारांनी एकत्र असलेले विकास आणि विशाल आता मात्र एकत्र राहतील असे वाटत नाही.

विशालवर होऊ लागली टीका

विशाल हा उत्तम स्पर्धक आहे. खेळात तो ज्या टीममध्ये असतो त्या टीमसाठी तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतो. तो जे खरं आहे ते बोलतो. पण या घरात खेळताना टीम म्हणून एकत्र राहणे आणि टास्क खेळणे देखील तितकेच गरजेचे असते. देवदूत आणि राक्षस टास्क दरम्यान विशालने नाहक काही गोष्टी केल्या आहेत अशी टीका होऊ लागली आहे. त्यामुळे विशालला नेमके करायचे तरी काय? असा प्रश्न फॅन्सनाही पडला आहे. विशालने हे करायला नको होतं असे अनेकांनी म्हटले आहे. विशाल आपल्या ग्रुपसाठी काहीच करत नाही असे देखील  दिसून येत आहे.

स्नेहा- आविष्कारमध्ये झाली चर्चा

स्नेहा आणि आविष्कारचे नाते हे आता सगळ्यांना माहीत झाले आहे. घरात आल्यापासून त्या दोघांमध्ये फारच कमी वेळा चर्चा झालेली दिसली आहे. पण बुधवारी झालेल्या एपिसोडमध्ये आविष्कार आणि स्नेहा यांच्यामध्ये झालेलला संवाद दिसत आहे. आविष्कारने मन मोकळे करत स्नेहाचा आणि तिच्या करिअरचा अभिमान वाटेल असे सांगितले. शिवाय कधी मदत लागली तरी सांग असे तो म्हणाला. त्यामुळे पहिल्यांदाच त्यांच्यामध्ये कोणीही नसताना असा संवाद झाला.

ADVERTISEMENT

मिनलने जिंकले मन

टास्क खेळण्याच्या बाबतीत मिनल सगळ्यात पुढे आहे. मीराने टॉचर करण्यासाठी तिला केस कापण्यास सांगितले. हे केस ट्रिमरने उडवायचे होते आणि टक्कल करायचे होते. त्यामुळे मिनलबद्दल लोकांना अभिमान वाटला आहे. तर मीराबद्दल पुन्हा एकदा चीड निर्माण झाली आहे. 

आता उद्या आणि काय होणार ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अधिक वाचा

Bigg Boss Marathi: पिस्तूल गर्ल सोनाली पाटील

ADVERTISEMENT

भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ होणार नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित

पुन्हा आले ‘बंटी बबली’,सैफ अली खान- राणी दिसणार पुन्हा एकत्र

28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT