ADVERTISEMENT
home / मनोरंजन
येऊ कशी तशी मी नांदायला

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून शुभांगी गोखलेंची एक्झिट, नेटकऱ्यांमध्ये चर्चा

ओम- स्वीटूची लव्हस्टोरी पाहणे प्रेक्षकांना जितके आवडते तितकीच ओमची आई ही प्रत्येकासाठी आपल्या आईसारखी आहे. ओमची आई म्हणजेच शकु मावशी आणि ही भूमिका साकारणाऱ्या अभिेनेत्री शुभांगी गोखले या घराघरात जाऊन पोहोचल्या आहेत. आई असावी तर अशी प्रतिक्रिया त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी उमटत असताना आता अचानक या मालिकेतून त्यांची एक्झिट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही एपिसोड वगळता शुभांगी गोखले या मालिकेला राम राम करणार आहेत. इतकेच नाही तर शुभांगी गोखले यांच्या जागी कोण येणार याची देखील चर्चा सुरु झाली आहे. मराठीतील आणखी एक चेहरा याची रिप्लेस्मेंट करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 ही अभिनेत्री घेणार शुभांगी गोखले यांची जागा

मालिकेसंदर्भात चर्चा या कायमच होत असतात. एखादी मालिका चांगली फॉर्ममध्ये असताना किंवा एखादा कलाकार पसंतीस उतरताना त्याच्या रिप्लेस्मेंटची चर्चा होणे हे अगदी स्वाभाविक असते. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेबाबतही अशीच चर्चा सुरु झाली आहे. सध्या सोशल मीडियावर शुभांगी गोखले या शकु मावशीची भूमिका सोडत असून त्या जागी एक नवी कलाकार दिसणार आहे. अशी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियामध्ये सुरु असलेल्या या चर्चेनुसार शुभांगी गोखले यांच्या जागी या मालिकेत शकुच्या भूमिकेत अभिनेत्री किशोरी आंबीये दिसणार आहेत. अनेक ठिकाणी या पोस्ट देखील व्हायरल होऊ लागल्या आहेत. पण मालिकेकडून यावर कोणतेही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. 

प्राजक्ताच्या ‘साजनी’ या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

अभिनेत्रींकडूनही नाही हिंट

बरेचदा एखाद्या मालिकेत कोणातीच रिप्लेस्मेंट करताना काही दिवस प्रोमो चालवले जातात. पण अजून असे कोणतेही प्रोमो चॅनेलकडून दाखवण्यात आलेले नाही. इतकेच नाही तर अभिनेत्रींनीही या संदर्भातील कोणतीही माहिती दिलेली नाही. किशोरी आंबीये या सध्या स्टार प्रवाहावरील मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत ती काम करत आहे. या मालिकेत त्यांची एक्झिट असेल असे काही दिसून येत नाही. त्यामुळे आता येत्या काही एपिसोड्समध्येच या गोष्टींचा खुलासा होईल.

ADVERTISEMENT

Bigg Boss Marathi: गायत्री-मीराचे उघडले डोळे, जय-उत्कर्षवर झाले नाराज

रिप्लेसमेंट नको

मालिकेत एखादा चेहरा पाहिल्यानंतर आणि त्याच्यासोबत तारा जुळल्यानंतर कोणालाही तो चेहरा बदलू नये असे वाटते. शुभांगी गोखले यांनी साकारलेल्या भूमिका खूप जणांना फारच जवळच्या वाटतात. त्यामुळेच की काय त्यांनी ही मालिका सोडून जाऊ नये असे अनेकांना वाटत आहे. शुभांगी गोखले या मालिकेसाठी एकदम परफेक्ट आहेत. त्यामुळे त्यांनी ही मालिका अजिबात सोडू नये असे अनेकांना वाटत आहे. पण आता मालिकेकडूनच याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. 

मालिकेत सध्या स्वीटू- ओमची अनबन सुरु आहे. ते पुन्हा एकत्र कधी येतील याचे प्रेक्षकही वाट पाहात आहेत..

03 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT