ADVERTISEMENT
home / Fitness
Hot Water Benefits In Marathi

दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)

भारतीय संस्कृतीत पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. कारण पृथ्वीप्रमाणे मानवी शरीरातदेखील सत्तर टक्के पाणी आहे. निसर्गाने केलेली ही व्यवस्था अगदी अदभूत आहे. जगातील कोणताही जीव पाण्याशिवाय जगू  शकत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. मानवी शरीरराला दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिण्याची गरज असते तसेच सकाळी चालण्याचे फायदे ही आहेत. मात्र अनेकांना शरीरासाठी थंड पाणी योग्य की कोमट पाणी असा प्रश्न पडतो. वास्तविक कोमट पाणी पिणेदेखील शरीरासाठी लाभदायक असते. कारण कोमट पाणी पिण्याने तुमच्या अनेक  आरोग्य समस्या कमी होऊ शकतात. यासाठीच जाणून घेऊया कोमट पाणी पिण्याचे शरीरावर काय चांगले फायदे होतात.

1. जाणून घ्या पाणी पिणं का महत्वाचे आहे ?
2. कोमट पाण्याचे आरोग्यदायी फायदे.
3. पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला सतत प्रोत्साहित करतील.
4. दररोज किती पाणी पिणे गरजेचे आहे ?
5. FAQ’s

जाणून घ्या पाणी पिणं का महत्वाचे आहे ? (Importance Of Drinking Water In Marathi)

आपल्याला लहानपणी शाळेत शिकविण्यात येतं की मानवी शरीर साठ टक्के पाण्यापासून तयार झालं आहे. या साठ टक्के पाण्यामुळेच शरीरातील महत्वाची कार्य सुरळीत चालतात. शरीराचे पोषण करणं, शरीरातील मुख्य स्त्राव योग्य प्रमाणात स्त्रवणास मदत करणं, रक्ताभिसरण करणं, पचन करणं आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवणं या अशा अनेक शारीरिक क्रिया पाण्यामुळे योग्य पद्धतीने चालतात. कदाचित आता तुमच्या नक्की लक्षात येईल की…तुमची आई तुम्हाला सतत पाणी पिण्यासाठी का सांगत असते. ‘डिहायड्रेशन’ ही अशी भयंकर समस्या आहे की जी सतत निर्माण होत असेल तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतात. सतत डिहायड्रेशन झाल्यास थकवा, मळमळणं, स्मृतीभ्रंश सारखे भयंकर मानसिक आजारदेखील यामुळे होऊ शकतात. या शिवाय पाणी कमी प्यायल्यास रक्तदाब कमी होणं आणि अशक्तपणादेखील येऊ शकतो. 

कोमट पाण्याचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits Of Warm Water In Marathi)

melissa-walker-horn-lo udD1o lk-unsplash

ADVERTISEMENT

पोटाचे आरोग्य सुधारते (Improves Digestion)

आरोग्य शास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यावे. कारण  त्यामुळे तुमचा बद्धकोष्ठता आणि अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. वास्तविक कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. ज्यामुळे तुमच्या पोटाच्या समस्या कमी होतात.

एजिंगच्या खुणा कमी होतात (Decreases Aging)

एजिंग म्हणजे वयाच्या आधी म्हातारपण येणं. आजकालचं वाढतं प्रदूषण आणि धावती जीवनशैली यामुळे अनेकजण वयाच्या आधीच वयस्कर दिसू लागतात. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जर तुम्हाला चिरतरूण दिसायचं असेल तर सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि तरूण दिसेल.

वजन कमी होते (Helps In Weight Loss)

कोमट पाणी पिल्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यासाठी दररोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून ते पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणार नाही आणि तुम्ही सुडौल दिसाल.

किडनी स्टोनची समस्या कमी होते (Removes Kidney Stones)

अनेकांना किडनी स्टोन अथवा मुतखड्याची समस्या असते. मुतखडा निघून जाण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. शिवाय जे लोक नियमित कोमट पाणी पितात त्यांना मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते.

ADVERTISEMENT

शारीरिक दुखणे कमी करते (Reduces Physical Pain)

जर तुम्हाला अंगदुखी अथवा सांधेदुखीचा  त्रास होत असेल तर कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित होतो ज्यामुळे दुखणे कमी होऊ शकते.

मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

त्वचा समस्या कमी होतात (Removes Skin Problems) 

त्वचेच्या सौंदर्यासाठी कोमट पाणी अक्षरशः वरदान आहे. त्यामुळे जर तुम्हाला एखादी त्वचा समस्या असेल तर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या अशा समस्या कोमट पाणी पिण्याने कमी होऊ शकतात. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील येईल.

सर्दी-खोकल्याच्या  त्रासातून आराम मिळतो (Relieves Cold Cough Problems)

बऱ्याचदा वातावरणातील बदल अथवा इनफेक्शनमुळे वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवतो. तुम्हालाही असा त्रास असेल तर नियमित कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे घसा आणि नाकातील कफ बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. कोमट पाणी पिणे हा खोकला आणि सर्दीवर चांगला उपाय आहे.

ADVERTISEMENT

केसांच्या समस्या कमी होतात (Decreases Hair Problems)

नियमित कोमट पाणी पिण्याने केस गळणे, केस कोरडे आणि निस्तेज दिसणे, केसात कोंडा होणे अशा समस्या दूर होतात.

पाणि प्रतिष्ठा बद्दल देखील वाचा

मासिक पाळीत आराम मिळतो (Relief In Menstrual Periods)

2. Benefits of warm water in Marathi

मासिक पाळीच्या काळात अनेकींना पोट, कंबर अथवा पाठीत वेदना जाणवतात. मासिक पाळीतील क्रॅम्प कमी करण्यासाठी या काळात कोमट पाणी प्या. काहीवेळ यामुळे तु्म्हाला आराम मिळू शकतो.

ADVERTISEMENT

जाणून घ्या आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचं महत्त्व आणि योग्य पद्धत

पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला सतत प्रोत्साहित करतील (Benefits Of Drinking Water In Marathi)

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात (Flushes Out Toxins)

शरीर शुद्ध करण्यासाठी बऱ्याचदा तुम्ही ग्रीन-टी अथवा एखाद्या फॅन्सी प्रॉडक्टचा आधार घेता. पण तुम्हाला माहित आहे का? मुबलक प्रमाणात पाणी पिणं हा देखील शरीर शुद्ध करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमच्या किडनीचे कार्य सुरळीत चालते. भरपूर प्रमाणात पाणी पिण्याने तुमचं रक्त आणि युरीन शुद्ध होते. म्हणूनच पाणी हे जीवन आहे असं म्हणतात.

पाण्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते (Makes Your Skin Healthy)

डिहायड्रेशन झाल्यास तुमची त्वचा कोरडी व निस्तेज दिसू लागते. निरोगी त्वचेसाठी स्वतःला डायड्रेट ठेवा. डिडायड्रेशनचा थेट प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला देखील भोगावे लागतात. एका संशोधनानूसार, तुमच्या शरीराला पुरेसा पाण्याचा पुरवठा झाल्यावरच तुमच्या त्वचेसाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा त्वचेला केला जातो. यासाठी जर तुम्हाला नितळ व चमकदार त्वचा हवी असेल तर पुरेसं पाणी प्या.

तुमची पचनसंस्था सुधारते (Helps Your Digestive System)

पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पाचकरस सौम्य होतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी गरम पाणी पिणं नक्कीच फायदेशीर आहे. दररोज जेवल्यानंतर गरम पाणी प्या. गरम पाण्याने मलविसर्जन चांगलं होतं आणि बद्धकोष्टतादेखील होत नाही.

ADVERTISEMENT

रोगप्रतिकारशक्ती सुधारते (Boosts Your Immunity System)

शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी मानवी शरीराला साठ टक्के पाणी गरज असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया उत्तम चालतात. पाण्यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. तुमची  रोगप्रतिकार शक्ती सुधारते.

डोकेदुखीपासून मुक्ती मिळते (Prevents Headaches)

डिहायड्रेशमुळे बऱ्याचदा मायग्रेनचा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला  देखील मायग्रेनचा त्रास असेल तर सतत पाणी प्या. ज्यांना सतत डोकेदुखी होत असेल तर अशा लोकांनी देखील नियमित पाणी पिण्याची सवय स्वतःला लावायला हवी.

पायामध्ये क्रॅम्प येत नाहीत (Prevents Leg Cramps)

झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास तुमच्या पायांमध्ये गोळे येत नाहीत. पायामध्ये गोळे अथवा क्रॅम्प येण्याचे प्रमुख कारण डिहायड्रेशन असू शकते. यासाठी मद्यपान, कॉफी घेणे टाळा. ज्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होणार आणि तुम्हाला डोकेदुखी, पायात कॅम्प येणे यापासून मुक्ती मिळेल.

पाठदुखी कमी होते (Prevents Backaches)

पाठदुखी ही बैठी कामे करण्याऱ्या लोकांची एक कॉमन समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या तुमचं शरीर लवचिक राहील. पाण्यामुळे पाठीचा मणक्यातील द्रव्यपदार्थ संतुलित राहतात. पाठीचा कणा लवचिक राहतो. कंबरेत चमक भरण्याची  समस्या असल्यास पाणी प्या. कारण पाण्यामुळे तुमच्या शरीरातील लॅक्टीक एसिड विकसित होऊन दाह कमी होतो. सतत पाणी प्यायल्याने तुम्हाला वारंवार वॉशरुमला जावं लागतं पण यासाठी मुळीच लाजू नका किंवा पाणी पिण्याचा कंटाळादेखील करु नका. लक्षात ठेवा लघवीवाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जात असतात.

ADVERTISEMENT

तुमच्या शरीराचे संतुलन राखले जाते (Restores Your Body Temperature)

मानवी शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. पेशीकार्य, टीश्यूंचे कार्य व निरनिराळ्या इंद्रियांची कार्य अशी शरीराचे दैनंदिन कार्य सुरळीत चालण्यासाठी पाणी गरजेचं आहे. पाण्यामुळे शरीराचे कार्य तर उत्तम चालतंच शिवाय शरीराचे तापमानदेखील संतुलित राहतं. घाम येणे, पचन करणे, हायड्रेशन या क्रियांमुळे वाढलेलं शरीराचे तापमान पाणी पिण्याने नॉर्मल होते.

तोंडाला दुर्गंध येत नाही (Prevents Bad Breath)

तोंड सुकल्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येऊ लागतो. तोंडाला दुर्गंध येण्यापासून वाचण्यासाठी स्वतःला हाडड्रेट ठेवा. पाणी पिण्याने तुमच्या तोंडात जेवणानंतर अडकलेलं अन्नकण अथवा जंतूदेखील निघून जातात.

हॅगओव्हर उतरविण्यासाठी मदत होते (Helps With Your Hangover)

मद्यपानामुळे शरीर डिहायड्रेट होते. मद्यपान केल्यास सकाळी ‘हॅगओव्हर’चा त्रास जाणवू लागतो. मद्यपान केल्यास रात्री झोपण्यापूर्वी भरपूर पाणी प्या किंवा सकाळी उठल्यावर तरी भरपूर पाणी प्या.

दररोज किती पाणी पिणे गरजेचे आहे ? (How Much Water Should You Drink Every day)

camille-brodard-ayGdCbHTzpg-unsplash

ADVERTISEMENT

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते तहान लागली नाही तरी दिवसभरात सतत पाणी पिणं फार गरजेचं आहे. पण काही जण सांगतात की दररोज कमीतकमी दोन लीटर तरी पाणी प्यावं. तुम्हाला किती प्रमाणात घाम येतो आणि तुमची शारीरिक क्षमता किती आहे यावर सारं काही अवलंबून असू शकतं.  जर तुम्ही खेळाडू असाल अथवा तुम्ही उष्ण प्रदेशात राहत असाल तर मात्र तुम्हाला यापेक्षा अधिक पाणी पिण्याची गरज असू शकते.

FAQ’s

1. पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ?

असं असलं तरी, जपानी लोकांचा असा विश्वास आहे की, निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही रोज सकाळी उठल्याबरोबर लगेचच चार ग्लास पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुमची त्वचा नितळ व निरोगी राहते. जपानी लोक हा नियम पाळतात याचं आणि एक कारण म्हणजे यामुळे तुमच्या मेटाबॉलिजमचा स्तर नियमित राहतो व तुमचे वजन कमी होते. पण याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही पाणी प्यायल्यानंतर पंचेचाळीस मिनीटं काहीही खात नाही.

2. दिवसभरात किती पाणी पिणं गरजेचं आहे ?

साधारणपणे तुमच्या शरीराला कमीतकमी दोन लीटर पाणी पाण्याची गरज असते. पण आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे संशोधनानूसार, तुम्हाला जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. जर दिवसभर दोन लीटर पाणी पिऊन देखील तुम्हाला सतत तहान लागत असेल तर तुमच्या शरीराला अधिक पाण्याची गरज असू शकते.

तसंच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल तर चयापचय व पचनक्रिया चांगली होण्यासाठी अजून एक लीटर पाणी प्या.

ADVERTISEMENT

3. मी रिकाम्या पोटी पाणी पिऊ शकते का ?

खरंतर सकाळी उठल्याबरोबर अनोशी पोटी पाणी पिणं ही एक जपानी पद्धत आहे. ज्याचा खूप चांगला परिणाम होतो. ब्रश न करता रोज चार ग्लास पाणी पिण्याने तुमचे मेटाबॉलिझम चांगले होते, तुमची त्वचा निरोगी दिसू लागते व तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत चालते. जपानी लोक यानंतर जवळजवळ 45 मिनीटे काहीही न खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे शरीरातील पोषकमुल्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात.  साधारणपणे ज्या महिलांना मासिक पाळीच्या समस्या असतात, तसेच डोळ्यांच्या समस्या आणि चयापचयाच्या समस्या असतात त्यांना ‘या’ पद्धतीने पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. शिवाय शरीर निरोगी राखण्याचादेखील हा एक सर्वात सोपा मार्ग आहे.

4. वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याचे काय फायदे होतात ?

पाणी पिण्याने विशेषतः बर्फाचं पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. एका संशोधनानूसार, तुमच्या रोजच्या सवयीपेक्षा एक लिटर पाणी अधिक पिण्याने काही महिन्यातच तुमचे वजन कमी होते. पाणी पिण्याने तुमचे चयापचयाचे कार्य वाढते, टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात व शरीर निरोगी राहते.

29 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT